रविवार, १७ जून, २०१२

सत्यमेव जयतेची जन्मकथा काय आहे?


सत्यमेव जयते ही मालिका सुरू होण्यापुर्वी आमिरखानने अनेक वाहिन्यांवर त्याच्या मुलाखती प्रक्षेपित झाल्या. चित्रपट क्षेत्रातले अनेक मान्यवर वाहिन्यांवर येऊन गाजले किंवा कोसळले असताना पक्का बिझीनेसमन असलेल्या आमिरने मात्र तिकडे वलण्याचा विचारही केला नव्हता. त्यालाहि ऑफ़र्स आल्या होत्या. त्यापैकीच एक ऑफ़र स्टारप्लसच्या उदय शंकर यांची होती. पण अन्य अभिनेत्यांप्रमाणे मनोरंजक कार्यक्रमात सहभागी व्हायला आमिरने नकार दिला. पण तेव्हापासून छोटा पडदा त्याच्या मनात घोळत होता. माग एक वर्षापुर्वी त्याच्या डोक्य़ात एक कल्पन आली आणि काही मित्रांच्या मदतीने त्याने संशोधन करून एक मालिकेची एक संकल्पना तयार केली. ती स्टारप्लस समोर मांडली. त्यांनीही मान्य केली. मगच त्या मालिकेची निर्मिती सुरू झाली. हे आमिरनेच मुलाखतीत सांगितले म्हणून मला ठाऊक. इथे एक वर्षापुर्वी आमिरला कल्पना सुचली असे तोच म्हणतो तेव्हा एक वर्ष आपणही मागे जाऊन बघायला हरकत नाही. अप्रिल २०१२ मध्ये सत्यमेव जयतेचा गवगवा सुरू झाला आणि ६ मे रोजी पहिला भाग प्रक्षेपित झाला. त्याच्या एक वर्ष आधी अप्रिल मे २०११ मध्ये काय झाले होते? अण्णा हजारे नावाचा एक माणूस आपल्या काही सहकार्‍यांच्या साथीने द्ल्लीत जंतरमंतर या जागी लोकपालच्या मागणीसाठी उपोषणाला बसला होता. तिथे जाऊन अनेकांनी अण्णांना समर्थन दिले त्यात आमिरखान याचाही समावेश होता. त्याच आसपास आमिरला सत्यमेव जयतेची संकल्पना सुचली असावी ना? मग त्याचा अण्णांचे आंदोलन वा उपोहण किंवा त्याने लोकांचे भारावून जाणे यांचा काही परस्पर संबंध आहे काय? अण्णांकडून आमिरने प्रेरणा घेतली की तिथे जमलेल्या गर्दीकडून आमिरला चालना मिळाली?    

त्याच्याही आधी "रंग दे बसंती" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर असाच आपल्या सहकारी कलावंतांसह दिल्लीत सुरू असलेल्या मेधा पाटकरांच्या उपोषण धरण्याच्या जागी जाऊन पोहोचला होता. त्यापुर्वी किंवा त्यानंतर कधी त्याने अशा चळवळी वा सामाजिक सामस्यांमध्ये लक्ष घातले, भाग घेतल्याच्या बातम्या नव्हत्या. जसे संदर्भ असतात वा त्याचे चित्रपत येतात तसे त्याने त्या समस्यांशी संबंधित आंदोलने वा चलवळींचा वापर प्रमोशनसाठी करून घेतला होता. एका व्यावसायिकाच्या हुशारीचे ते लक्षण आहे. चित्रपट चालवावा म्हणून त्याने असे करण्यात व्यावसायिक नितीमत्ता सामावलेली आहे व होती. असो, अण्णांच्या आंदोलनाला शुभेच्छा द्यायला गेलेल्य आमिरला त्याच दरम्यान सत्यमेव जयतेची संकल्पना सुचावी हे त्याच्या चाणाक्ष व्यावसायिकतेचेच लक्षन आहे. त्याबद्दल कोणी तक्रार करण्याचे कारन नाही. अण्णा टीम ज्या भ्रष्टाचाराकडे लोकांचे लक्ष वेधत आहेत, त्याला गांजलेल्या सामान्य माणसाकडून मोठाच प्रतिसाद मिलत आहे. त्यातून सार्वजनिक जीव्न व शासन प्रशासन यांच्या धोरणात्मक भ्रह्टाचाराने जनजीवन कसे मेटाकुटीला आले आहे, त्याच्याकडे लोकांचे प्रथमच लक्ष वेधले जात आहे. अशा लोकांसमोर अन्य भ्रष्टाचार व अनाचार आणले तर गैर काहीच नाही. त्यामुळेच आमिरच्या सत्यमेव जयते मालिकेने ज्या सामाजिक व व्यावसायिक विकृती लोकांसमोर मांडल्या आहेत त्याने लोक भारावून जाणे स्वाभाविक आहे. चटकन असेही वाटेल की अण्णा जे काम करत आहेत त्याला आमिरचे काम पुरकच ठरणारे आहे. पण तिथेच लोकांची दिशाभूल होत आहे आणि त्यासाठीच सत्यमेव जयतेच्या जन्मकालाची कथा मोलाची आहे.

एक गोष्ट कोणालाही मान्य करावी लागेल की ६ मे २०१२ रोजी आमिरच्या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झालापासून त्याचाच माध्यमातून इतका गवगवा चालू आहे की त्याच कालखंदात अण्णा व रामदेव यांनी मोठी झेप घेतली असताना, त्यांच्यावरचे लोकांचे लक्ष कमी झाले आहे. लोकपाल वा अन्य भ्रष्टाचाराचे विषय यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यात आमिरने मोठेच यश मिलवले आहे. की त्यासाठीच ही मालिका इतकी वाजतगाजत समोर आणली गेली आहे? पहिले तीनचार भाग प्रामुख्याने सरकारी व शासकीय भ्रष्टाचार व निष्क्रियतेचे परिणाम आहेत. त्यातला खरा गुन्हेगार सत्ताधारी, राज्यकर्ते, प्रशासन, व सरकारी धोरणे हेच आहेत. स्त्रीभृणहत्या, बालशोषण, वैद्यकीय व औषधविषयक कायदे यातल्या त्रुटी वा पलवाटाच पुढल्या परिणामांना कारणीभूत झाल्या आहेत. पण आमिरने त्याबद्दल सरकारकडे एकदाही संशयाचे बोट दाखवू नये, हे संशयास्पद नाही काय? उलट प्रत्येक बाबतीत अन्य क्षेत्रातील संस्था, व्यावसायिक, व्यक्ती यांनाच खलनायक म्हणुन दाखवण्याची चतुराई त्याने का करावी? सरकारवरील लोकांच्या राग संतापाचा रोक अन्यत्र वळवण्यावाठी पद्धतशीर असा हा प्रयत्न आहे का? रामदेव यांच्या आश्रमावर टांगली तलवार ठेवणार्‍या सरकारला १९७५ सालच्या हाथी समितीच्या शिफ़ारशी अंमलात आणायला कोणी अडवले आहे? सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सरकारच्या गैरकारभाराला औषध कंपन्या वा खाजगी डॉक्टर जबाबदार नाहीत. मग मुळ दुखणे जे सरकारी नालायकी वा निष्क्रियता आहे त्याबद्दल आमिर गप्प का? उलट त्या नालायकीचा जे लाभ उठवतात, त्यांच्याकडे बोत दाखवत आमिर सरकारच्या पापावर पांघरून घ्हालतो आहे काय? ३२

अण्णांच्या किंवा रामदेव यांच्या आंदोलनाचा सगला रोख जो सत्ताधीश, सरकार व राजकारणी यांच्याकडे होता व आहे त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वलवण्याचा हा प्रयास नाही काय? नसेल तर मुख्य समस्या, खरे दुखणे व खरा विचका याबद्दल आमिर त्याच्य एकून कार्यक्राअत गप्प कशाला? की आजच्या सत्ताधीशांनी त्यासाहीच त्याला कामाला जुंपले आहे? अण्णा व रामदेव यांच्यावर बेछूट आरोप करून लोकांचे लक्ष विचलित होत नाही तर त्यासाठी सत्यमेव जयते हे सत्ताधार्‍यांनी शोधलेले नवे वळण आहे काय? मागल्या काही लेखांमधून मी आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला किंवा सरकारने अंग काढून घेत जनतेचे आरोग्य खाजगी क्षेत्राकडे सोपवले त्याचे अनेक दाखले दिले आहेत. आजच्या अनेक वैद्यकीय, आरोग्यविषयक समस्यांना तोच आकर्तेपणा जबाबदार असताना त्याबद्दल आमिरचे मौन संशयास्पद नाही काय? जे माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला साध्या चिकित्सक नजरेने बघता येते व सांगता येते तेच आमिरच्या संशोधक टीमला शोधून का सापडत नाही? की शोधायचेच नाही किंवा सांगायचेच नाही?

आमिरअ नेहमी संशोधक टीमचा उल्लेख करतो. ते खरेच संशोधन करतात की तपासकाम करतात? तपास व सशोधन यात मोठा फ़रक असतो. संशोधक सर्व बाजू तपासून बघत असतो. चांगले वाईट परिणाम बघत असतो. सत्याचा शोध घेत असतो. त्याला आअदत सो वा नसो तो सत्य समोर आनतो. याच्या नेमकी उलट परिस्थिती तपासकामाची असते. जे पोलिस करतात. ते आधी एखाद्याला आरोपी म्हणुन निश्चित करतात आणि मग त्याला आडकवणारे पुरावे साक्षिदार शोधत असतात. त्यांना सत्याशी कर्तव्य नसते. ज्याला आरोपी ठरवले त्याला दोषी ठरवणारे पुरावे त्यांना हवे असतात. ते सम्शोधनाने सिष्कर्ष काढत नाहीत. त्यांचा निष्कर्ष आधीच तयार असतो. त्याला पुरक दाखले पुरावे त्यांना हवे असतात. असे शोधकाम चालते त्याला सम्शोधन नव्हे तर तपसकाम म्हणतात. आमिरच्या टीमने असेच तपासकाम केले आहे. त्यासाथी आधी त्यांच्या कथेतील आरोपी म्हणजे खलनायक निश्चित केले होते. म्हणूनच त्यांना मी इथे जे पुरावे व दाखले देतो आहे त्यापैकी काहीच सापदले नाही. आणि सापदले असेल तर त्यांनी लोकांना सांगण्यापेक्षा लपवाछपवी केली आहे. हाथी समितीचा अहवाल व शिफ़ारशी महागड्या औषधांच्या भागात का समोर आणला गेला नाही? कारण सरळ आहे. तसे केले तर कंपन्यांना खलनायक म्हणायच्या आधी लोकांचा राग त्याच भामट्या कंपन्यांचा छुपा बॉस असलेले सरकार समोर येइल ना? ४७

म्हणून मला वाटते की आमिरची ही मालिका सत्य प्रस्थापित करण्यापेक्षा सध्या जे सरकार विरोधी वातावरण तापले आहे त्यावरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी केलेले आयोजन असावे. त्यातून दोन हेतू साध्य होऊ शकतात. एक म्हणजे अण्णांच्या, रामदेवांच्या आंदोलनाकडून लोकांचे लक्ष विचलित होते. दुसरीकडे सरकारच्या खर्‍या पापाचे खापर भलत्यांच्याच डोक्यावर फ़ोडले जाऊन सरकारला सहीसलामत निसटता येते. याच्याही पलिकडे आमिरखानची एक आदर्श प्रतिमा जनमानसात तयार होते. त्याच्या शब्दाला वजन प्रप्त होते. उद्या त्याच्या एका शब्दावर मते फ़िरवता व वलवता येतात. यातले पुढे काय होते, कसे होते ते बघूच.      ( क्रमश:)
 भाग  ( २९८ )    १७/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा