गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूष इतके क्षुल्लक नसतात

सामर्थ्य आहे चळवळीचे (४)

  समर्थ रामदासांनी पुन्हा मुर्तीपूजेचे थोतांड सुरू केले, असाही एक आक्षेप असू शकतो. पण त्यात तथ्य नाही. सवाल देवळातल्या देवाचा वा त्यातल्या मुर्तीचा नाही. गावोगावी अशा देवळांची स्थापना ही प्रतिकात्मक होती. त्यातून त्या त्या गावात वस्तीमध्ये अस्मितेची प्रतिके त्यांना उभारायची होती. त्यामागे त्या मुर्तीचे थोतांड उभे करण्यापेक्षा तिला अस्मितेचे प्रतिक बनवून तिच्या संरक्षणार्थ उभे ठाकण्याची प्रेरणा स्थानिक पातळीवर रुजवण्याचा हेतू महत्वाचा होता. माणूस कुठल्या तरी अभिमान स्वाभिमानासाठीच लढायला उभा रहातो आणि त्यासाठी अशी प्रतिके मोलाची कामगिरी बजावत असतात. आजही आपल्या देशाच्या सीमेवर थंडीवारा सोसत उभा असलेला जवान सैनिक तिरंगा नावाच्या एका प्रतिकासाठीच लढत असतो आणि आपले प्राण ओवाळून टाकत असतो. तेव्हा तेही एक कापडच असते. त्या झेंड्याला आपला बचाव करता येत नसेल, तर त्याची महत्ता ती काय; असे आपण म्हणत नाही. कारण ते हिदूस्तानच्या अस्मितेचे प्रतिक असते. तसेच धर्मस्थान वा श्रद्धास्थान हे निव्वळ प्रतिक असते. कधी सजीव तर कधी निर्जीव असते. त्याच्यात कुठली चमत्कारी शक्ती नसते. त्यातला चमत्कार त्याच्यासाठी लढायला उभ्या ठाकणार्‍या समाज समुहामध्ये दडलेला असतो. म्हणूनच धर्मस्थान वा देवळाची महत्ता सामुहिक जीवनात मोठी असते. दोन दशके उलटून गेल्यावरही अयोध्येत उध्वस्त करण्यात आलेल्या निरूपयोगी अवशेषरुपी बाबरी मशीदीचे तेच कौतुक आहे. आजही मुस्लिम त्यासाठी अश्रू ढाळत असतात व कुठल्याही स्तराला जाऊन आक्रोश करीत असतात. कारण त्या स्थानाला अस्मितेचे रुप आहे. समर्थांनी नव्याने देवळांच्या उभारणीची मोहिम हाती घेतली, कारण त्यांच्याच समकालीन शिवरायांनी धर्मासह भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे कंकण हाती बांधले होते. त्या संस्कृतीच्या अस्मितेची प्रतिके जागोजागी उभी करून समाजातला स्वरंरक्षणाचा पुरूषार्थ जागवणे; हा त्याचा एक हेतू होता. तसाच एकूण हिंदू समाजातील क्षात्रवृत्तीचे पुनरुत्थान हा दुसरा हेतू त्यामागे होता. अशा रितीने आपल्या वस्तीतले गावातले अस्मितेचे प्रतिक जपायला पुढे येण्यातून जी लढावूवृत्ती जोपासली जाणार होती, तीच पुढे सैनिक होऊन शिवरायांच्या सैन्यात भरती व्हायला हातभार लावणार होती.

   थोडक्यात समर्थांनी आपली अध्यात्मिक चाकोरी सोडून राजकीय, सामाजिक वाट चोखाळली होती, तर शिवरायांनी राजकीय सत्तेत राहुन परमार्थाची सामाजिक जबाबदारी उचलली होती. दोघेही चाकोरी सोडून एकाच कालखंडात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कामाला लागले होते. या दोघांनी परस्पर पुरक कार्य आरंभले होते आणि त्यांच्या कुठल्याही काम वा कृतीने एकमेकांच्या उद्दीष्टाला छेद दिला नाही. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदून जाऊ शकले नाहीत. म्हणूनच महाराष्ट्राचाच नव्हेतर भारतवर्षाचा इतिहास बदलून गेला. सभोवारचे अनेक देश व राष्ट्रे, समाज आपली परंपरा, वारसा व इतिहास गमावून बसले; त्याच काळात हिंदूस्तानला मात्र आपली ओळख व वारसा टिकवता आलेला आहे. आफ़्रिकेपासून मलेशियापर्यंत सभोवारच्या भूगोलाचा ऐतिहासिक चेहरामोहराच बदलून गेला. आज तिथल्या समाजाला आपलीच पूर्वपुण्याई आठवू शकत नाही, अशा प्रदिर्घ कालखंडात भारताचा चेहरामोहरा कायम राहू शकला. त्यामागे महाराष्ट्रातील या दोघा महापुरूषांची दूरदृष्टी व दुर्दम्य इच्छाशक्तीच कारणीभूत झाली आहे. मग ते परस्परांशी संबंधित होते, गुरूशिष्य़ होते किंवा सहकारी होते, असल्या वादाला अर्थच उरत नाही. दोघांनी साधलेले परिणाम अभूतपुर्व आणि कौतुकास्पद आहेत. त्यांच्यातले वाद व वितुष्ट शोधणार्‍यांना आज इतिहासाचा अभ्यास वा छाननी करता येते; त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी भारतीय अस्मितेला सुखरूप राखण्यासाठी केलेले परस्पर पुरक व संयुक्त प्रयास हेच आहे. दोघेही परस्परांच्या शत्रूसारखे वागले वा जगले असते; तर आपलीही अवस्था पाकिस्तान वा इराण, इजिप्तसारखी होऊन आपण ऐतिहासिक वारशाबद्दल बोलूही शकलो नसतो. उलट शेकडो वर्षापुर्वी कधीकाळी अरबी प्रदेशात इस्लामच्या आरंभ काळात जे पंथ निर्माण झाले, त्याच्या अभिमानाने प्रेरित होऊन शिया-सुन्नी अशा वैरासाठी एकमेकांच्या उरावर बसलो असतो. समर्थ रामदास ब्राह्मण होते किंवा शिवराय मराठा होते, त्यामुळे त्यांच्या जातीची अस्मिता घेऊन आपण भांडूही शकलो नसतो. कारण आपली तशी जातीची वा वारशाची ओळखही आपण केव्हाच विसरून गेलो असतो.

   ज्या जातीय भेदभाव वा पक्षपाताच्या भूमिकेत आजचे काही विद्वान वा या महापुरूषांचे पाठीराखे एकमेकांची उणीदुणी काढत असतात आणि त्यासाठी त्याच महात्म्यांची नावे घेत असतात; त्यांना त्या थोरपुरूषांच्या जीवनाचे उद्दीष्ट व सार कितपत कळले आहे, याचीच मग शंका येते. हे त्यांचे भक्त वा अनुयायी ज्या आवेशात एकमेकांच्या अंगावर जात असतात व परस्परांना नामोहरम करीत असतात, तसेच तेव्हा त्या दोघांनी केले असते; तर आज समर्थ रामदास किंवा शिवराय असली नावेही आपल्याला आठवली नसती. ती आपल्याला आठवतात, स्मरणात आहेत, कारण त्यांनी आपल्या कार्यकाळात परस्परांना पुरक असे समाज जोडायचे व समाज उभा करण्याचे संयुक्त कार्य पार पाडलेले आहे. आजच्या जातीय अस्मितेचीच कास धरत त्यांनीही परस्परांच्या विरोधातली लढाई केली असती; तर कोणी मराठा राहिला नसता किंवा कोणी ब्राह्मणही राहिला नसता. इथेही शिया-सुन्नी असल्या रक्तरंजित संघर्षात आपणही अस्मिता गमावल्यासारखे भरकटत गेलो असतो. शिवराय, समर्थ रामदास किंवा ज्ञानेश्वर-तुकोबा ही इतकी प्रचंड व्यक्तीमत्व असतात, की त्यांचे आकलन होण्यापुर्वीच आपले आयुष्य़ संपून जाऊ शकेल. अमावस्येचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र जसे भिन्न दिसतात, तसे आपण या महापुरूषांना भिन्न स्वरुपात पाहून त्यावरूनच भांडत बसतो. पण त्यांच्या कार्याची महती वा त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा थांग आपल्याला लागलेला नसतो. म्हणूनच त्यांच्यातले गुण व त्यांची शिकवण आत्मसात करण्यापेक्षा आपण त्यांच्यात काय नव्हते, याचा शोध घेऊन चिखलफ़ेक करण्यात धन्यता मानू लागतो. तिथेच मग आपण त्यांचाच पराभव करीत असतो. त्यांच्याच महान कार्याची व इतिहासाची विटंबना करीत असतो. लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीने सागराला घागरीचे क्षुल्लक रूप देत असतो. शिवराय किंवा समर्थ रामदास यांचे ऐतिहासिक कर्तृत्व सागरासारखे अथांग अफ़ाट असते, तो महासागर उपसण्यापेक्षा त्यातली रत्ने माणके शोधावीत. इतक्या पराक्रमी व कर्तबगार थोरपुरूषांच्या संरक्षण वा समर्थनासाठी आपल्यासारख्या क्षुल्लक लोकांनी धावावे; इतके ते छोटे नसतात. आपणही आपल्या मोठेपणासाठी त्यांना छोटे करू नये, इतकेच सांगावेसे वाटते. (समाप्त)

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

इतिहास घडवतात ते महापुरूष

सामर्थ्य आहे चळवळीचे (३)

   इतिहास घडत असतो, तसाच घडवला जात असतो. बहुतांश लोक इतिहास घडेल तसे बघत बसतात आणि त्याला शरण जातात. पण मोजकेच लोक असे असतात, जे इतिहासाची मनमानी स्विकारत नाहीत. ते इतिहासाला वळण देऊ बघतात, त्यासाठी झुंजतात. शिवराय आणि समर्थ रामदासांचा कालखंड बघितला तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात इतिहासाला शरण गेलेल्या समाजात इतिहासाशी झुगारणारे तरूण उदयास आले. शिवरायांच्या समकालीन अनेक मराठे व हिंदू राजांपाशी शौर्य होते. पण इतिहासाला गवसणी घालून त्याला वेगळा आकार देण्य़ाच्या इच्छेचा त्यांच्यामध्ये अभाव होता. जी सरंजामशाहीची चाकोरी अनेक पिढ्यांपासून तयार झालेली होती, ती सोडण्याची इच्छाच तेव्हाचे अनेक सरदार जहागिरदार गमावून बसले होते. अशावेळी शिवराय त्या ऐषारामी जीवनाला झुगारण्यास पुढे सरसावले. त्यांनी चाकोरी सोडून बलाढ्य वाटणार्‍या बादशहा, सुलतानांच्या सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रस्थापित सरदारांची मदत मागण्यापेक्षा त्यांनी नव्या दमाच्या तरूणांना हाताशी धरले आणि त्यातूनच नवे सरदार लढवय्ये उभे केले. पारंपारिक युद्धाची निती ही सत्ता किंवा संपत्ती, धनदौलत संपादन करण्याची होती. पण शिवरायांची निती त्यापासून अगदीच भिन्न म्हणजे चाकोरीला छेद देणारी अशी आढळते. त्यांनी उभे केलेल्या सामाजिक नेतृत्वामध्ये अस्मितेची धार दिसते. तशी धार तात्कालीन अन्य कुठल्या राजा, सरदाराच्या सेनेत किंवा सहकार्‍यांमध्ये आढळून येत नाही. आपले राज्य स्थापन करावे आणि आपण राजा व्हावे म्हणून त्यांनी लोकांना लढायला आमंत्रित केले नाही. सामुहिक अस्मितेसाठी व तिच्या संरक्षणासाठी लढणारे तरूण शिवरायांनी उभे केले. त्यांच्या सवंगड्यांच्या कथा त्याची साक्ष देतात.

   लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे, असे म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे किंवा आधी लगीन कोंडाण्य़ाचे, असे बोलून गेलेला तानाजी मालुसरे, निव्वळ टाळ्या मिळवणारी चमकदार वाक्ये बोललेले नाहीत. त्यातून त्यांनी शिवरायांच्या राजनितीचेच पाठ सांगितले आहेत. लाख मेले तरी चालतील, म्हणजे सामान्य सैनिकापेक्षा राजवंशाची महत्ता बाजीप्रभू सांगत नव्हता. तर शिवरायांसारखा दुर्मिळ नेता हरपला तर अवघी स्वराज्याची चळवळच संपुष्टात येईल, असेच त्याला म्हणायचे होते. आपल्यासारखे लढणारे शेकडो मिळतील, निर्माण होतील, पण शिवरायांसारखा प्रेरणादायी नेता क्वचितच कुणा समाजाला मिळतो, तो गमावून चालणार नाही; असेच त्याला म्हणायचे होते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिवराय त्याला सुखरूप सोबतच घेऊन जायला उत्सुक आहेत व तसे सांगत आहेत. पण खुद्द राजाच्या आदेशाची बाजीप्रभू एकप्रकारे अवज्ञाच करतो आहे. कारण त्याच्यासारख्या सहकार्‍याला गमावण्याच्या चिंतेने राजा भावुक झालेला होता. तो आपली अवज्ञा करीत नसून आपल्याला कर्तव्याची जाणिव करून देतो, हे समजण्याइतके शिवराय प्रगल्भ होते. तर आधी लगीन कोंडाण्याचे म्हणणारा तानाजीही महाराजांना स्वराज्याच्या चळवळीतील प्राधान्याची आठवण करून देतो आहे. खुद्द महाराज रायबाच्या लग्नसोहळ्यानंतर कोंडाण्याच्या मोहिमेचे बोलतात. पण तानाजी त्यांना नकार देतो आणि महाराजही ते मान्य करतात? राजाची अवज्ञा वाटण्यासारखी तीसुद्धा घटना आहे. पण त्यातून स्वराज्याची लढाई, ही तात्कालीन राजकीय सामाजिक उत्थानाची कशी प्रभावी चळवळ होती, त्याचीच साक्ष मिळते. जेव्हा असे सहकारी महाराज शोधतात व निवडतात, तेव्हा त्यामागची प्रेरणा किती संन्यस्त होती, याचेच दाखले मिळतात. असे सरदार, सहकारी शिवरायांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी लढत नव्हते, तर एका समाजाच्या अस्मितेचे पुनरुत्थान करण्यासाठी कंबर कसून उभे राहिलेले होते. एकूणच त्या कालखंडाचे परिशीलन केल्यास जाणवते, की तो इतिहास एका चळवळीचा होता. त्यात लढाईचे वा मनगटाचे, तलवारीचे सामर्थ्य काम करीत नव्हते; तर चळवळीचेच सामर्थ्य ओळखून स्वराज्याची मुहूर्तमेढे रोवली गेली होती. त्याच कालखंडातले संन्यासी समर्थ रामदासही स्वराज्याचा मंत्र देत फ़िरतात आणि अध्यात्मातून तीच ज्योत पेटवत जातात, हा योगायोग नसतो.

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे

   हे समर्थांचे शब्द नेमके त्या घडामोडींशी जुळणारे का असावेत? मग त्यांच्याकडून घेतलेल्या अनुग्रहानंतर शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती काय? मुळात महाराजांनी समर्थांना गुरू तरी मानले होते काय? असले वाद आता खेळण्यात अर्थ नाही. कारण त्यातला बारीकसारीक तपशील इतिहासजमा झालेला आहे. महत्वाचे आहे, ते त्यातून साधले गेलेले ऐतिहासिक परिणाम. कारण या दोघा महापुरूषांनी केलेले परस्पर पुरक कार्य मराठी व हिदूस्तानी समाजाचे अपुर्व असे पुनरुत्थान करून गेलेले आहे. जेव्हा समस्त हिंदुस्तानातील बिगर इस्लामी स्थानिक राजसत्ता मोडकळीस आलेल्या होत्या आणि लढण्याची कुवत हरवून बसल्या होत्या;  त्याच कालखंडात या दोघा महापुरूषांनी या खंडपाय देशाची अस्मिता सामर्थ्याने प्रतिकारासाठी उभी करण्याचे महान कार्य केलेले आहे. सातव्या शतकानंतर जेव्हा इस्लामी फ़ौजा धर्मप्रसारासाठी हाती शस्त्र घेऊन चौफ़ेर उधळल्या; तेव्हा त्यांच्या टाचेखाली जगातल्या अनेक समाज-संस्कृती पुरत्या जमीनदोस्त होऊन गेल्या. आज त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. अनेक समाज व राष्ट्रे आपला वारसाच गमावून बसली आहेत. अस्मिताही हरवून गेली आहेत. कधीकाळी आपापल्या उत्क्रांत धर्म संस्कृती परंपरांमध्ये उन्नत झालेल्या शेकडो लहानमोठ्या समाजांच्या खाणाखुणा आज आशियासह आफ़्रिका खंडातून बेपत्ता होऊन गेल्या आहेत. सुमेरियन वा बायझंटाईन, पर्शियन संस्कृती उध्वस्त होऊन गेल्या आहेत. जगातले अदभूत रहस्य मानल्या जाणार्‍या पिरॅमिडसारख्या उन्नत संस्कृतीचा वारसा इजिप्शियनांना आठवत सुद्धा नाही. इराण्यांना आपली भरभराटलेली पर्शियन संस्कृती माहितही नाही. अफ़गाणिस्तानची उदात्त बौद्ध संस्कृती नामशेष होऊन गेली. हा सर्व विध्वंस होत असतानाच्या काळातच भारतीय व हिंदू संस्कृतीलाही ग्रहण लागलेले होते. पण तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडायला कुणी सामर्थ्यवान या उपखंडातून पुढे यायला राजी नव्हता. पण तरीही आज ती कित्येक शतकांचा वारसा सांगणारी भारतीय संस्कृती टिकून राहिली, त्याचे श्रेय महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आलेल्या दोन महापुरूषांचे आहे आणि त्यांच्या परस्पर पुरक सामाजिक आध्यात्मिक कार्यालाच आहे. ते समकालीन शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासच होत. कारण त्यांनी अन्य पौर्वात्य देशांप्रमाणे इस्लामी आक्रमणाला शरण जाऊन नष्ट होण्यास नकार दिला आणि प्रतिकाराची चळवळ इथे रुजवली व जोपासलेली होती. त्यातून त्यांनी इतिहासाला वेगळे वळण देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

   तसे संत परंपरेतूनही याच धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणाला सशस्त्र नव्हेतर सामुहिक प्रतिकार करण्याचे आंदोलन त्याच आधीच्या कालखंडात सुरू होते. मुस्लिम नसणे वा इस्लामचा स्विकार केला नाही, तर नागरिकांना आपल्याच जन्मभूमीत दुय्यम व पक्षपाती वागणूक देण्याचा जो अन्याय सुरू झाला होता, त्याला तोंड द्यायला संतांनी कंबर कसली होती. एकेकट्या पडलेल्या समाजाला त्यांनी वारकरी बनवून धर्मापेक्षाही आपला सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या मोहिमा चालविल्या. एक जमाव आपल्या देवधर्माचा जयघोष करीत उजळमाथ्याने घराबाहेर पडून मैलोगणती यात्रा करीत पंढरपुराला जाऊ लागला. मग जिथे म्हणून त्याचा मुक्काम पडायचा, तिथे गावातले लोक वारकर्‍यांची सेवा पाहुणचार म्हणून शेवटी आपल्या धर्माची व संस्कृतीचीच पाठराखण करायला निर्भयपणे घराबाहेर पडू लागले. थोडक्यात देवळातला देव धोक्यात आला, तेव्हा याच संत परंपरेने मनातली धर्माची व संस्कृतीची अस्मिता जपण्याची सामुहिक मोहिम चालविली होती. ती सुद्धा चळवळच होती. भारतातले धर्म मुळातच संघटित स्वरूपातले नव्हते आणि आक्रमक परके तर संघटित धर्माची व धर्मप्रसाराचीच मोहिम घेऊन अंगावर आलेले. त्यातून धर्म व संस्कृती जगवण्याचा प्राथमिक प्रयास केला, तो संत परंपरेने. पुढे त्या जगवलेल्या संस्कृती व धर्माच्या अस्मितेतून क्षात्रधर्माचे स्फ़ुल्लींग पेटवण्याचे काम शिवाजी महाराज व समर्थांनी शिरावर घेतले. तिथून संत परंपरा खंडीत झाल्यासारखी दिसते. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सामुहिक चळवळीचे इतिकर्तव्य तिथे थांबले. कारण देवळांचे संरक्षण करणारा समर्थ राजा व योद्धा उदयास आला होता. म्हणून की काय, त्याच संत परंपरेची धुरा पुढल्या काळात देवळांची नव्याने उभारणी करणार्‍या समर्थांकडे आलेली दिसते. गावोगावी त्यांनी नव्याने देवळांची, देवस्थानांची उभारणी करण्याची मोहिम हाती घेतली. (अपुर्ण)

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

इतिहासातले ते अजोड उदाहरण

सामर्थ्य आहे चळवळीचे (२)

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांचे परस्पर पुरक कार्य

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांची शोकांतिका

ज्ञान की जैसे सीमा ज्ञानी
गागर मे सागर का पानी

   ‘आम्रपाली’ नावाचा सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट चार दशकांपुर्वी येऊन गेला. त्यामध्ये लतादिर्दींच्या स्वरातील एका गीतामधल्या या ओळी आहेत. कवीचे हे बोल अतिशय उदबोधक आहेत. विद्वान किंवा बुद्धीमंत स्वत:ला सर्वज्ञानी समजत असतो. त्याला अवघ्या जगाचे ज्ञान प्राप्त झाले अशीच त्याची समजूत असते. म्हणूनच आपणच ज्ञानाची सीमा किंवा हद्द आहोत; अशी त्याची ठाम समजूत असते. आपल्याला जेवढे उमगले आहे, त्यापेक्षा विश्वात आणखी काहीच ज्ञान नाही; म्हणूनच आपण ज्ञानाची परीसीमा आहोत, अशी त्याची धारणा असते. पण ती कितपत सत्य व वास्तव असते? विशाल सागराचे पाणी घागरीत भरून घ्यावे आणि त्यालाच सागर समजावे, असेच ते अ‘ज्ञान’ असते. कारण घागरीतल्या पाण्याच्या अनंत पटीने सागर शिल्लक असतो आणि कुठल्याही घागरीत वा पात्रामध्ये मावणार नाही; असे त्याचे अथांग आकारमान असते. पण त्याचे भान सुटले, मग व्यक्ती स्वत:ला ज्ञानाची परीसीमा मानू लागते. ज्ञानाचा विद्वत्तेचा अहंकार चढलेल्या बुद्धीमंताची ही स्थिती असेल, तर मग त्याच्या अनुयायाची किंवा भक्ताची अवस्था काय असू शकते? त्याला तर आपला गुरू वा बुद्धीमंत स्वामीच सर्वव्यापी व जगाचा नियंता वाटू लागतो. पण प्रत्यक्षात त्याच्या गुरूचे ज्ञानच घागरीत मावेल, इतक्या सागराच्या पाण्यासारखे क्षुल्लक असते. पण स्वामी वा गुरूपेक्षा त्या अनुयायी भक्ताचा अहंकार अधिक मोठा असतो. त्याला तर अवघ्या जगाचे ज्ञानच आपल्या मुठीत बंद झाल्यासारखे वाटत असते. त्याबद्दल चर्चा वा चिकित्साही करायची त्या भक्ताची तयारी नसते. आणि असे कोणी सामान्य बुद्धीचे भक्तगण असतात असेही मानायचे कारण नाही. त्या भक्ताला साक्षात त्याच्या गुरू वा स्वामीनेही सत्य सांगायचा प्रयास केला, तरी भक्त त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. गुरूला मान्य असलेली स्वत:मधली त्रुटीही, त्याच्या भक्ताला मान्य होऊ शकत नाही. ही जगातील वास्तविकता आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक सेन्ट मार्टीन ल्युथर त्याचीच साक्ष देतो. तो म्हणतो,

    ‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्या समोर मांडले गेले आहे, त्यावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्द न शब्दाला आपण धट्ट धरून रहायला हवे असे मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी स्वर्गातून खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले, तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत, म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन’. असे म्हणणारा सेन्ट मार्टीन ल्युथर कोण आहे आणि कोणाची शिकवण तो सांगतो आहे? ख्रिस्ताची शिकवण म्हणजे त्या प्रेषीताला स्वर्गातल्या देवदूतांनी दिलेले संदेशच होत. म्हणजे ख्रिस्ताला देवदूतांनी जे सांगितले असे त्यानेच नव्या करारातून सांगितले आहे; त्यात देवदूतालाही दुरुस्ती करण्याची मोकळीक हा ख्रिस्ताचा अनुयायी द्यायला तयार नाही. कुठल्याही अनुयायाची व भक्ताची हीच अवस्था असते. त्याला उमगलेले ज्ञान वास्तवाशी निगडीत असायचे कारण नसते. आणि कुठल्याही महापुरूष व महात्म्याची अवस्था नेमकी अशीच असते. त्याच्या अनुयायांना तो जसा व जितका आकलन झाला आहे, त्यापेक्षा वेगळा असायची मुभा भक्तही त्या स्वामी, परमेश्वर किंवा गुरूला, महापुरूषाला देत नसतात. तिथे आपल्यासारख्या सामान्यजनांची काय कथा?


   विचार तत्वज्ञानाची ही़च तर शोकांतिका असते. त्यामागे ताकद नसते, तेव्हा ते निर्जीव निष्क्रिय दुर्लक्षित पडून रहाते. त्याच्या मागे ताकद उभी राहिल्याशिवाय त्याची परिणामकारक सिद्ध होत नाही. पण ती ताकद म्हणून जी झुंड उभी रहाते, त्या झुंडीच्या आकलनानुसार त्या विचार किंवा तत्वज्ञानाचा व्यवहारी अविष्कार होत जातो. त्यात पहिला बळी पडत असतो, तो ज्याने विचार मांडले खुद्द त्याच विद्वानाचा. कारण त्याचे अनुयायी म्हणवणारे त्या थोरपुरूषाच्या नावावर स्वत:चे आकलनच सक्तीने लोकांच्या गळी मारायचा उद्योग भरभराटीस आणतात. अशा आक्रमक शक्तीशाली आकलनाखाली वास्तविक मुळचा विचार गाडला जात असतो. म्हणूनच मानवी इतिहासात बहुधा कुठलाही विचारवंत वा महापुरूष, महात्मा आपल्याच अनुयायांच्या तावडीतून सुटू शकलेला नाही. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. आज विविध पातळीवर होणार्‍या चर्चा, वादविवाद किंवा आंदोलने व संमेलने, यातला विसंवाद त्यातूनच आलेला दिसेल. अगदी एकाच विचारधारेचे पाईक एकमेकांवर धावून जाण्याइतके परस्पर विरोधी दावे करीत असतात. समान विचारधारेचा वारसा सांगणारेच एकमेकांचे असे शत्रू का होतात; असा आपल्याला अनेकदा संभ्रम होतो. त्याचे हेच कारण आहे. त्या विचारांचे भिन्न आकलन त्या अनुयायांना एकमेकांच्या विरोधात उभे करत असते. जसे एकाच घरातले भाऊबंद पराकोटीचे दुष्मन व्हावेत, पण एकाच मूळपुरूषाचा वारसा सांगत त्याच्या मालमत्तेवरचा मक्तेदार हक्क सांगत भांडावेत, तसे हे एकाच विचारधारेचे अनुयायी भाऊबंदकी करताना दिसतात. त्याला विचारातील विरोधाभास नव्हे, तर आकलनातला विरोधाभास कारण होत असतो. असे अनुयायी मूळपुरूषाचा वारसा सांगणारे असतात, तरी दुसर्‍या तिसर्‍या पिढीतल्या आपल्या अत्यंत निकटच्या जन्मदात्याचाच वारसा घेऊन लढायला उभे ठाकलेले असतात. इथे विचारधारेचे अनुयायी सुद्धा तसेच समोरासमोर उभे ठाकलेले दिसतील. ते मूळ विचारवंत महापुरूषाचा वारसा तोंडाने सांगत असले, तरी ज्याचे आकलन स्विकारलेले असते, त्याच्या बाजूने लढायला उभे राहिलेले असतात. म्हणूनच मग समान विचारधारेचे अनुयायीच परस्पर विरोधी दावे करीत हमरातुमरीला आलेले दिसतात. त्यातून त्याच विचारधारा किंवा परंपरेचे धिंडवडे काढण्यात पुढाकार घेत असतात. त्याच विचारांची व तत्वांची अक्तरे करीत असतात.

   भारताच्याच नव्हेतर जगाच्या इतिहासात त्याची शेकडो उदाहरणे सापडतील. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्या इतिहासात शेकडो महात्मे उदयास आले आणि त्यांनी आपापल्या परीने चिंतन करून या समाजाला उन्नत करण्याचा आपापल्या मार्गाने प्रयास केलेला आहे. कोणी निव्वळ चिंतन, तत्वज्ञानाने तर कोणी हाती शस्त्र घेऊन अस्मितेच्या रुपाने, कोणी विविध प्रकारचे संशोधन व अभ्यासातून समाजाची उन्नती घडवली, तर कोणी वैचारिक सामाजिक उत्थानातून देशाला घडवण्याचा प्रयास केलेला आहे. त्या त्या कालखंडातील परिस्थिती व साधनांच्या उपलब्धतेनुसार त्यांनी कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांना आपण महात्मे, महापुरूष, चिंतक म्हणून ओळखतो, अशा प्रत्येकाचा प्रयास समाज व देशाला उन्नतीकडेच घेऊन जाण्याचा होता. दुर्दैवाने त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी, पाठीराख्यांनी किंवा शिष्यांनीच त्यांचा पराभव केलेला दिसतो. ज्या जंजाळातून समाजाला मुक्त करण्याचे प्रयास त्या महात्म्यांनी केलेले असतात व त्यासाठीच आपले जीवन समर्पित केलेले असते; त्यांच्याच विचार व उत्थानाच्या तत्वांचा उपयोग पुन्हा त्या समाजाला प्रथा परंपरांच्या जंजाळात गुरफ़टून टाकण्यासाठी होत असतो. मात्र त्यासाठी त्या महात्म्यांच्या विचार व चिंतनाचे जसे ज्याला आकलन झाले, त्याचाच अशी वारस व्यक्ती एक जंजाळ बनवते आणि त्यालाच प्रतिक बनवून त्याचा मायाबाजार बनवत असते. अशारितीने मग त्या महात्म्याला बाजूला टाकून अनुयायीच स्वत:चे महात्म्य निर्माण करीत असतात. त्यासाठी मग दुसर्‍या कुणा महात्म्याची खिल्ली उडवली जाते. दोन वा अधिक महापुरूषांमध्ये भिंती उभारल्या जातात. त्यांचे विचार परस्पर विरोधी वा एकमेकांसमोर युद्धाच्या तयारीत उभे केले जातात. असे महापुरूष एकमेकांचे शत्रू होते किंवा त्यांच्यात वैरभावना होती, असे आभास निर्माण केले जातात. पण वास्तवात पाहिल्यास सर्वच महात्म्यांनी परस्पर विच्छेदक भूमिका न घेता, परस्पर पुरक समाज उत्थानाचेच कार्य केलेले दिसते. त्यांच्या दिशा भिन्न वा छटा वेगवेगळ्याही दिसतात. पण एकूणच मानव जात किंवा समाजाच्या उन्नती वा भल्यासाठीच त्यांनी कार्य केलेले दिसते. मात्र ते सत्य मानले व त्यानुसार वाटचाल केली, तर त्याच तत्वांचे व विचारांचे मायाबाजार उभे करणार्‍यांची दुकाने बंद होण्याचा धोका असतो. म्हणूनच या दुकानदारांना महात्मे व महापुरूष एकमेकांच्या विरोधात युद्धसज्ज अवस्थेत आणून उभे करावे लागतात. ज्यांनी समाज जोडायचे काम केले, त्यांनाच समाज तोडण्याचे हत्यार म्हणून उभे धार लावली जाते. (अपुर्ण)