गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

सेक्युलर मुखवट्यातले लोक बदमाश असतात


   गेले दोन आठवडे मी मुंबईतील अझाद मैदान परिसरात रझा अकादमीच्या मुस्लिम गुंडांनी जो हैदोस घातला, त्या निमित्ताने उहापोह करणारी लेखमाला लिहितो आहे. अर्थात ते एक निमित्त आहे. खरा विषय त्यापेक्षा व्यापक व सर्वस्पर्शी आहे. कारण जे तिथे घडले ती जिहादी मानसिकतेची झलक होती. त्याहीपेक्षा ती मुस्लिम समाजाला धर्मांधतेकडे फ़रफ़टत घेऊन जाण्याची जी योजना आहे, त्याचा एक भाग होता. म्हणुनच त्याचे निमित्त करून गेली कित्येक वर्षे हिंदू मुस्लिम अविश्वास किंवा जे धर्मांधतेचे भूत आपल्या देशाला भेडसावते आहे, त्याची कारणमिमांसा करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. त्यात तसे नवे काहीच नाही. आजवर अनेकांनी तसा प्रयत्न केलेला आहे. पण त्यात जी निरपेक्षता व नि:पक्षपातिपणा हवा, त्याचा लवलेश आढळत नाही. बहुतेक विश्लेषण हे कुठल्यातरी बाजूने एकतर्फ़ी केलेले असते. मग त्यात अनेक वास्तविक गोष्टी वा घटना लपवण्याचा प्रयास असतो. किंबहूना सत्य लोकांसमोर येऊच नये याची काळजी अशा विवेचनात घेतलेली दिसून येते. आणि म्हणूनच या नाजूक तेवढ्याच संवेदनाशील विषयावर सांगोपांग लेखमाला लिहिण्याचा विचार मला करावा लागला. त्याचा चांगला प्रतिसादही मला वाचकांकडून मिळतो आहे. कारण गेल्या दोन आठवड्यात सातशे आठशे वाचकांनी मला फ़ोनवर संपर्क साधून प्रतिक्रिया दिल्या, त्यात प्रथमच मुस्लिम वाचकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यापैकी इमाम नदाफ़चा एसएमएस मी आधी छापलेलाच आहे. पण तसे खुप आहेत ज्यांनी तोंडी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यवतमाळचे दौलत खान त्यापैकीच एक आहे. तसाच देशदूत या दैनिकात वार्ताहर म्हणून काम करणार्‍या एका मुस्लिम तरूणाची प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणुन इथे देतो.

भाऊ थॅन्क्स, आजच आपल्या लेखमालेत मौलाना गुलाम व जावेद अख्तर यांचे अनुभव मांडले, ती देशप्रेमी मुसलमानांची दबकी आवाज आहे. म्हणून शुभेच्छा. आपला वाचक आरिफ़ शहा, रिपोर्टर दैनिक देशदूत

यापेक्षा माझे लिखाण योग्य दिशेने चालले आहे, याचा आणखी कुठला दाखला देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पण हा असा एकच सुखद अनुभव नाही. लातूर येथून आलेला एक फ़ोन असा मला जास्त सुखावून गेला. तोही एका मुस्लिम बांधवाचा. त्याला तर माझी लेखमाला आवडली आहेच, पण त्याच्या घरातल्या सर्वांना आवडल्याचे त्याने अगत्याने सांगितले. मजा तेवढीच नाही. मी त्याचे आभार मानले, तेव्हा त्यानेच यापुर्वी एकदा फ़ोन केल्याची आठवण मला करून दिली. तेव्हा म्हणजे तीन महिन्यांपुर्वी मी आमिर खानच्या सत्यमेव जयतेचे वाभाडे काढणारे लेख लिहिले होते, तेव्हा जे अनेक वाचक अस्वस्थ झालेले होते व चिडून ज्यांनी मला फ़ोन केले होते, त्यातलाच हा एक मुस्लिम मराठी वाचक होता. त्याची आठवण त्यानेच करून दिली. पण जेव्हा पटले नाही तेव्हा मनमोकळेपणने त्यांनी तक्रार केली होती. आणि जेव्हा आवडले वा पटले तेव्हा तेवढ्याच मोठ्य़ा मनाने त्यांनी माझे अभिनंदन केले. (त्यांचे नाव माझ्या लक्षात राहिले नाही, त्याबद्दल क्षमस्व). पण असे कित्येक फ़ोन आले व येत आहेत. मात्र अशा आनंदात असताना बुधवारी एक असा फ़ोन आला, की त्याने माझ्या आनंदात मिठाचा खडा टाकला. म्हणूनच मला नेहमीचा उहापोह बाजूला ठेवून वाचकांच्या प्रतिक्रियेवर आज लिहावे लागत आहे.

   त्याच दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी एक फ़ोन असा आला, की त्याने मी विचलित झालो. त्यावर बोलणार्‍या गृहस्थांनी अत्यंत पोक्त भाषेत मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला. ‘आजवर तुम्ही लोकपाल वगैरेवर लिहित होता ते ठिक आहे; पण आता ज्या विषयाला तुम्ही हात घातला आहे तो अत्यंत संवेदनाशील विषय आहे. त्याच्या परिणामांचे भान ठेवा. लिहिता चांगले, पण जे वाचणारे आहेत त्यांना त्यातला गर्भितार्थ कितपत कळत असतो? आमच्या सारख्यांना तुमचे म्हणणे कळेल, पण जो सामान्य वाचक असतो त्याला यातले काही कळत नाही, त्याच्या सामान्य बुद्धीच्या पलिकडला हा विषय आहे, वगैरे’. हे ऐकून मी थक्क झालो. कारण चार दशकाहून अधिक का्ळ पत्रकारिता करताना मी कधीच वाचकाला मुर्ख वा अल्पमती समजलेलो नाही. आणि हे गृहस्थ मला वाचक अडाणी अल्पबुद्धी असतो असे ठणकावून सांगत होते. किंबहूना सामान्य माणसाबद्दलची तुच्छता त्यांच्या शब्दातून अजिबात लपत नव्हती. जणु सामान्य जनता व नागरीक यांना काही अक्कल नसते आणि म्हणुन त्यांना काय सांगावे किंवा त्यांच्यापासून काय लपवावे, हे आपण शहाण्यांनी ठरवले पाहिजे. जनतेला तिचे भलेबुरे कळत नाही, त्यामुळे त्या मुर्ख लोकांना सत्य असेल तसे सांगण्याची वा समजावण्य़ाची गरज नाही, असाच त्यांचा दावा होता. आव तर त्यांनी जनहिताचा आणला होता, पण त्यातला रोख सामान्य माणसाला तुच्छ लेखण्याचाच होता.

असे मी काय मोठे घातक लिहितो आहे? जे लोकांपासून लपवायची गरज आहे? आणि असे काय आहे की ते लोकांना कलले तर त्याच्यासाठिच घातक आहे? सत्य लोकांसाठी, समाजासाठी घातक असते काय? नेहमीप्रमाणे असे फ़ोन करणारे कधी आपले नाव सांगत नाहीत की गाव सांगत नाहीत. पण मोबाईल ही अशी उत्तम सोय आहे की त्यान त्यांचे नंबर नोंदले जात असतात. इथेही त्यांचा नंबर (९२७१६४००२१) माझ्या मोबाईलवर नोंदला गेला. मात्र मी त्यांना काही प्रश्न व खुलासे विचारले तेव्हा त्यांनी फ़ोन तोडला. जेव्हा उत्तर नसते तेव्हा असेच होते. मी चार दशकापुर्वी आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात पत्रकारिता सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत कधी वाचकाला अडाणी समजलो नाही, की अल्पमती समजलो नाही. म्हणुनच सत्य सांगताना मला कधीच वाचक काय करील, याची भिती वाटली नाही. पण मी आज जे लिहितो आहे ते तथाकथित सेक्युलर शहाणे व सेक्युलर पाखंडी पत्रकारितेबद्दल लिहितो आहे. त्यामुळे ज्यांचे पितळ उघडे पडते आहे, असे लोक विचलित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मग असे अनाहुत सल्ले देण्याचा सेक्युलर प्रयास कोणी केला असू शकतो. कारण ही आजच्या सेक्युलर शहाण्याची धारणाच आहे. त्यांना वाटते, की आपण माध्यमे कब्जात घेतली मग लोकांपर्यंत सत्य जाऊच शकत नाही. मग आपला खोटेपणा किंवा असत्ये आपण लोकांच्या गळ्यात आरामात उतरवू शकतो. आणि संवेदनशील म्हणुन सत्याची सहज गळचेपी करू शकतो. पण त्यातला मुर्खपणा त्यांच्या कधीच लक्षात आलेला नाही. आता याच गृहस्थांचे घ्या. जे काही ते मला सांगत होते, त्याचा मतितार्थ त्यांना तरी कळत होता किंवा नाही, याचीच मला शंका येते. जे शब्द आपण बोलत आहोत, त्याचा अर्थ त्यांना तरी कळत होता काय? पण आव तर असा होता की जगातला सगळा शहाणपणा किंवा बुद्धी जी काही असेल तिचे अर्क काढून त्यांनीच प्राशन केलेले असावे.

   त्यांचे म्हणणे होते, की मी लिहित आहे तो अत्यंत संवेदनाशील विषय आहे. आणि म्हणुनच मी त्यावर अधिक लिहू नये. किती विरोधाभास आहे बघा. विषय संवेदनाशील असेल तर त्याबद्दल संवेदनशील असायला हवे ना? आणि मी त्या्वरच सविस्तर उहापोह करून तो विषय अत्यंत सोप्या भाषेत लिहितो आहे ना? म्हणजेच संवेदनशील असलेला विषय मी संवेदनशील पद्धतीने हाताळतो आहे, तर त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. आणि त्याच संवेदनशील विषयावर मी गप्प रहावे म्हणजे बधीर असावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांची ती अपेक्षा उर्वरित माध्यमे म्हणजे तिथले सेक्युलर पत्रकार पुर्ण करत आहेतच. मी एकटाच या गंभीर व संवेदनशील विषयाला बधीरपणा सोडून हात घातला, त्याने हे महाशय विचलित झालेले आहेत. किती विचित्र बाब आहे ना? जो मामला संवेदनशील आहे त्याबाबतीत सामान्य जनतेला अंधारात ठेवणे, हा त्यांना शहाणपणा वाततो. ज्या सामान्य जनतेला अशा संवेदनशील समस्येचे चटके सोसावे लागतात, तिलाच त्यापासून अंधारात ठेवणे त्यांना उपाय वाटतो. हा खरा भारतीय सेक्युलर मानसिकतेचा हिडीस चेहरा आहे. त्यांना लोकांना समस्या व प्रश्नांबद्दल जागृत करायचे नाही, सावध करायचे नाही, तर अंधारात चाचपडत ठेवुन झुंजवायचे आहे. दंगल किंवा हिंसक प्रतिक्रिया नेहमी गैरसमजातून उमटत असतात. ते दूर केले व एकमेकांना समजून घेतले, तर संवाद सुरू होतो. त्यातून दोन वा अधिक समाज गट गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकत असतात. पण तसे करण्याऐवजी त्यांच्यातले गैरसमज कायम रहातील व एकमेकांकडे संशयाने बघत रहातील, या धोरणाला मी सेक्युलर का म्हणतो; त्याचा हा फ़ोन म्हणजे उत्तम पुरावा आहे. त्यातले दोन मुद्दे मला अत्यंत आक्षेपार्ह वाटतात. एक म्हणजे सत्याची लपवाछपवी आणि दुसरा म्हणजे सामान्य माणसाविषयीची तुच्छता. आणि म्हणूनच सेक्युलर शहाणे मला समाजासाठी अत्यंत धोकादायक मंडळी वाटतात.
 भाग  ( १६ )    ३१/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा