मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

मोदींच्या लोकप्रियतेचे रहस्य.


   अनेकदा माणसे सहजगत्या काहीतरी बोलतात वा सांगतात. काहीजण अगदी अनवधानाने मनातले बोलतात तर काहीजण विचारपुर्वक काही बोलतात. पण वाचणारा किंवा ऐकणारा ते गंभीरपणे घेतोच असे नाही. कधीकधी असे बोललेले किंवा वाचलेले मनात राहुन जाते आणि सवडीने मनातल्या मनात त्यावर विचार होत रहातो. उहापोह चालत असतो. काही वेळानंतर वा काही काळानंतर अचानक त्याचे संदर्भ स्पष्ट होतात किंवा त्यातून एक नवी दिशा मिळत असते. काहीतरी नवेच गवसत असते. अनेकदा भिन्न लोकांनी सांगितलेल्या मुद्दे वा गोष्टीत परस्पर संबंध आढळून येतात. एकाने उपस्थित केलेल्या गहन प्रश्नाचे उतर दुसर्‍याच्या वक्तव्यात सापडू शकते. म्हणूनच मला अशी माणसे ऐकावीशी किंवा वाचावीशी वाटतात. अगदी सहजगत्या ते आपल्याला शिकवत वा प्रगल्भ बनवित असतात. मजेची गोष्ट म्हणजे त्यांना त्याचा पत्ताही नसतो. फ़ेसबुकवर असा अनेकदा अनुभव येत असतो. घरबसल्या एका जागी जगातल्या शेकडो लोकांचे मनोगत आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असते. आपण त्यातले निवडक घेतो वा बर्‍याच अंशी त्याकडे दुर्लक्षही करतो. सगळेच वाचायला, तपासून विचार करायला वेळही नसतो. पण म्हणून कशालाही टाकावू वा फ़ालतू समजण्याची चुक मी करीत नाही. शक्य तेवढे वाचून व समजून घेण्याचा प्रयास करीत असतो. अर्थात याला दुसरीही बाजू असते. काहीजणांना चर्चा वा विचारविनिमय वगैरे नको असतो. त्यांना उचापती वा खोडसाळपणा करण्यातच धन्यता वाटत असते. त्यामुळे डिवचण्य़ाचाच उद्योग अशी मंडळी करीत असतात. त्यांच्याकडे काणाडोळा करून आपण मोकळ्या मनाने फ़ेसबुक वा आपल्यापर्यंत येणार्‍या माहितीचा वेध घेतला; तर आपला लाभ होऊ शकतो. मला तरी होतो. कारण अनेकदा असेच मित्र नकळत महत्वाचे दुवे किंवा विषय सहजगत्या देऊन जातात. अनुत्तरीत प्रश्नाची सोपी उत्तरे सुचवून जातात. गेल्या दोनतीन दिवसात मला असाच एक अनुभव आला.

माझ्या मित्रयादीत असलेले रविंद्र पोखरकर आणि धोडोपंत आपटे असे दोन भि्न्न प्रकृतीचे मित्र आहेत. त्यांच्या जवळपास लागोपाठ आलेल्या दोन पोस्ट मी वाचलेल्या होत्या. वाचून सोडूनही दिलेल्या होत्या. म्हणजे गंभीरपणे प्रतिक्रियाही दिलेल्या नव्हत्या. दिल्या त्याही थातूरमातूर होत्या. पण दोघांच्या पोस्ट मनात कुठेतरी घुमत राहिल्या असाव्यात. मंगळवारी अचानक भिन्न विषयांवरील त्यांच्या पोस्टमधील संबंध मला उलगडला. इतरांनीही त्यांच्या त्या मूळ पोस्ट वाचायला हरकत नसावी. दोन्हीत सुतराम परस्पर संबंध नाही, हे मगच लक्षात येऊ शकेल. त्या पोस्ट अशा.....

Ravindra Pokharkar

नरेंद्र मोदींच्या प्रचंड लोकप्रियतेचं नेमकं मूळ कशात आहे..?
गुजरातमधील नरसंहार..विकास..की आणखी काही..?
मोदी भक्तांनी कृपया शिवीगाळ न करता उत्तर द्यावे ही नम्र विनंती..!
===========================

झिम्बाब्वे संघाचे मन:पूर्वक अभिनंदन...............
२३९ ला झिम्बाब्वेनी पाकड्यांची खोलून मारली, याचा मला खूप आनंद झाला आहे.
पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो. असो.
डेव्ह व्हॉटमोर ने केस वाढवल्याचे पाहिले होते. आज त्यांचा पॉनिटेल घातलेला पाहिला. आता तेच कर म्हणावं. तीच वेळ आलेय तुझ्यावर आयुष्यात.

आपला,
(आनंदित) धोंडोपंत
============================
   दोघांचे विषय किती टोकाचे भिन्न आहेत ना? एकाने मोदींच्या प्रचंड लोकप्रियतेचे रहस्य कशात असा सवाल केला आहे; तर दुसरा झिंबाब्वेने पाकिस्तानला क्रिकेटमध्ये पराभूत केल्याचा आनंद व्यक्त करतो आहे. दोन्हीत कुठे तरी संबंध जोडता येईल काय? वाचून बाजूला झालो, तेव्हा मलाही तसेच वाटले होते. पण मनात त्यातले जे दुवे रेंगाळत राहिले व क्रमाक्रमाने लक्षात आले, की पोखरकरांच्या प्रश्नाचे उत्तर धोंडोपंतांची आपल्या पोस्टमधून सहजगत्या देऊन टाकले आहे. मोदींची लोकप्रियता आणि झिंबाब्वेने पाकिस्तानला पराभूत करण्याचा काय संबंध येतो ना? पण बारकाईने धोंडोपंतांच्या पोस्टमधील एक वाक्य वाचा. ते म्हणतात, ‘पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो.’ ह्या वाक्याचा संदर्भ मोदींच्या लोकप्रियतेशी जोडला जातो का?

   पोखरकरांना मोदींच्या लोकप्रियतेचे कारण हवे आहे आणि धोंडोपंत पाकच्या पराभवातील आपल्या आनंदाचे कारण सांगत आहेत. त्यांना झिंबाब्वेच्या विजयाचा आनंद झालेला नाही. ते पाकिस्तानच्या पराभवाने आनंदित झालेले आहेत. तो पराभव कोणी केला व कसा केला; याच्याशी त्यांना अजिबात कर्तव्य नाही. पाकिस्तानचा पराभव हे धोंडोपंतांच्या आनंदाचे कारण आहे. मोदींच्या लोकप्रियतेची कारणमिमांसा नेमकी तशीच करता येईल. मोदींची आज दिसणारी लोकप्रियता ही झिंबाब्वेच्या विजयासारखी फ़सवी आहे. धोंडोपंतांना झालेला आनंद झिंबाब्वेच्या विजयाचा आहे, असे जर कोणी समजत असेल तर ती त्याची चुक आहे. कारण त्यांनी इथे आपल्या आनंदाचे कारण स्पष्ट केलेले आहे. पण मोदींच्या बाबतीत तसे घडत नाही. मोदींचे लोकांना आकर्षण कशाला आहे, त्याच शोध घेतला जात असतो. पण त्यापेक्षा मोदी कोणाला पराभूत करू बघत आहेत वा करण्याची शक्यता आहे; त्याचा शोध घेतला तर उत्तर सहजगत्या सापडू शकेल. मोदी सतत कॉग्रेसच्या विरुद्ध बोलत असतात आणि तथाकथित सेक्युलर मंडळी मोदींचे टारगेट आहे. सहजिकच सेक्युलर व कॉग्रेस यांना पाकिस्तानच्या जागी ठेवून धोंडोपंताची प्रतिक्रिया विचारात घ्या. मग लक्षात येईल, की मोदींची लोकप्रियता हा निव्वळ आभास आहे. जे कोणी आज मोदींचे समर्थन हिरीरीने करताना दिसतात; त्यांचे मोदीप्रेम हे भाजपा वा कुठल्या राजकीय विचारांशी निगडीत नसून कुठल्या तरी तिरस्कार वा तिटकार्‍यातून त्यांचे मोदीप्रेम उदभवले आहे. अशा मोदीप्रेमींना मोदी विजयी होण्यापेक्षा मोदी ज्यांना पराभूत करायल सज्ज झालेत; त्यांना पराभूत होताना बघायला हे मोदीप्रेमी उत्सुक आहेत. म्हणूनच त्यांच्या मोदीप्रेमाला मी आभास मानतो. कारण अशा बहुतांश मोदीप्रेमींना हिंदूत्व, संघ वा भाजपाशी काडीमात्र कर्तव्य नाही. त्यांना मोदी पंतप्रधान झालेले बघण्यात तसूभर रस नाही. त्यापेक्षा त्यांना कॉग्रेस वा तथाकथित सेक्युलर पाखंडाला पराभूत झालेले बघण्यात स्वारस्य आहे. जसे धोडोपंत म्हणतात, ‘पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो.’

   जसे धोंडोपंतांना झिंबाब्वेविषयी कुठले प्रेम नाही, तसेच मोदीप्रेमींनाही या माणसाविषयी आकर्षण नाही. त्यापेक्षा आपण ज्यांना शत्रू वा निकामी समजतोय, त्यांचे निर्दालन करण्याची आपली इच्छा पुर्ण करणारा एक उमेदवार; इतकेच हे मोदीप्रेम मर्यादित आहे. धोंडोपंतांच्या वाक्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ते म्हणतात, ‘कुठेही व कुणाकडूनही पाकिस्तानचा पराभव’ हा भाग महत्वाचा आहे. त्याचा दुसरा अर्थ काय होतो? झिंबाब्वेच्या जागी बांगलादेश वा श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा पराभव झाला असता; तर धोंडोपंत कमी आनंदी झाले असते काय? अजिबात नाही. त्यांनी तितकाच आनंद व्यक्त केला असता. कारण त्यांना कोणाच्या विजयात आनंद नसून; त्यांचा आनंद कुणाच्या तरी पराभवात सामावलेला आहे. नेमकी हीच गोष्ट मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा अभ्यास व विश्लेषण करताना विसरली जाते. मोदी भाजपाचे आहेत किंवा संघाशी संबंधित आहेत, याच्याशी लोकांना कर्तव्यच नाही. मोदी बाजूला ठेवा. त्यांच्या जागी जनता दल युनायटेडचे नितीशकुमार यांनी सेक्युलर थोतांड व कॉग्रेसच्या पराभवाचा चंग बांधून ते भारतीय लोकांना सामोरे आले असते; तरी त्यांची लोकप्रियता अशीच दिसून आली असती. तेच कशाला जयललिता, मुलायम, ममता किंवा कोणी मार्क्सवादी पक्षा़चा नेताही असता, तरी त्याच्या मागे लोक असेच धावले असते. कारण आज भारतीय लोकांमध्ये कॉग्रेस व त्यांनी मागल्या दहा वर्षात चालवलेल्या सेक्युलर पाखंडाबद्दल तिरस्कार उफ़ाळला आहे. त्याचे भांडवल भाजपाचा कुठलाही नेता करू शकला नाही. उलट माध्यमांच्या पोरकट विश्लेषणाला भुलून अडवाणीही सेक्युलर व्हायला गेले. डुप्लिकेट सेक्युलर कोणाला चालेल? मोदींनी त्याच लोकभावनेचा नेमका धुर्तपणे फ़ायदा उठवला आहे.

   मोदींनी सेक्युलर नाटक करण्यापेक्षा पाखंडी सेक्युलर पक्ष व त्यांच्या भंपकपणाला कंटाळलेल्या लोकांना आपणच या पाखंडाचा बंदोबस्त करू शकतो, अशी आशा दाखवलेली आहे. सहाजिकच त्या पाखंडाला कंटाळलेला वर्ग व त्याच्या विरोधातला वर्ग मोदींकडे आकर्षित झालेला आहे. त्याला मोदी वा भाजपाविषयी काडीमात्र आकर्षण नाही. उलट त्याला ज्याचा तिटकारा आलेला आहे, त्याचे निर्दालन करणारा कोणी भेटला, त्याचा आनंद आहे. म्हणून तो नरेंद्र मोदींचा उदो उदो करू लागला आहे. म्हणूनच मी त्याला लोकप्रियतेचा आभास म्हणतो. त्याचे प्रत्यंतर मग आपल्याला विविध मतचाचण्यांमध्ये पडलेले दिसते. भाजपापेक्षा मोदी यांची लोकप्रियता प्रत्येक चाचणीत अधिक दिसून येते. याचा अर्थच असा, की त्या मतदाराला (धोंडोपंतांप्रमाणेच) भाजपाच्या राजकीय विचार वा पक्षाशी कर्तव्य नाही. त्याला कॉग्रेस व सेक्युलर नाटकाविषयी तिटकारा आहे. आणि त्यासाठी त्याला कॉग्रेसला पराभूत करणारा कोणीही नेता चालणार आहे. ती भूमिका मोदींनी मोठ्या धुर्तपणे आपल्या अंगावर घेतली आहे. तिसर्‍या आघाडीचा झेंडा मिरवणार्‍या कोणा नेत्याने बाकीच्या छोट्यामोठ्य़ा पक्षांना एकत्र करून तसा पवित्रा घेऊन आक्रमकपणे त्याच सेक्युलर थोतांडाच्या विरोधात उभे रहायची हिंमत दाखवली; तर तीच लोकप्रियता मोदींना सोडून त्याच्याकडे वळायला वेळ लागणार नाही. कारण स्पष्ट आहे. अशा देशभरच्या ‘धोंडोपंतां’ना मोदींच्या विजयाची आकांक्षा नसून सेक्युलर थोतांडासह कॉग्रेसला पराभूत होताना बघायचे आहे.

७ टिप्पण्या:

  1. bhau he khupach uthal vishleshan jhale......
    sorry.... but this is not expected from u..
    arthach kadhaycha ani sambhandhach jodayacha tar...
    vachak sudnya aahet....
    vande matram

    उत्तर द्याहटवा
  2. काही दिवसांपूर्वी अण्णा हजारेंना अशीच लोकप्रियता मिळाली होती. त्याचेही कारण हेच असावे असे आपल्याला वाटते का?

    उत्तर द्याहटवा
  3. Mac d shi sahamat. Post vishesh patli nahi. Lekhak swatache mat lokanche mat ahe ase samjun mandat ahet. Shivay tich tich goshta parat parat sangitlyane post kantalwani zali ahe.

    उत्तर द्याहटवा
  4. पाकडे कुठेही, कुणाकडूनही पराभूत होतात तेव्हा मला असाच आनंद होतो.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रिय महोदय,
    पूर्णत: असहमत.
    मोदी को मिलनेवाले वोट का तथाकथित धर्म निरपेक्षता से कोई लेना देना नहीं है. मोदी की इमेज आपके भीतर एक सपना, एक विश्वास पैदा करती है. एक सकारात्मक सृजनात्मक राष्ट्रवाद से आपको जोड़ती है.
    भारत के कई राज्यों में जहां तथाकथित धर्मनिरपेक्ष शक्तियां मजबूत है जैसा कि केरल, त्रिपुरा, तमिलनाडु और प. बंगाल, वहां मोदी नहीं है फिर भी कांग्रेस मजबूत नहीं हो सकी. आज कांग्रेस के पास नई पीढ़ी के लिए कोई भव्य और दिव्य सपना नहीं है. आजादी के पैसठ साल बाद मुफ्त का या सस्ता अनाज कोई भव्य सपना तो नहीं हो सकता जो वोटर को आकर्षित कर सके.
    राहुल गाँधी का व्यक्तित्व हमारे मन में कोई आशा या सपना निर्मित नहीं कर सकता है. और कांग्रेस के पास कोई दूसरा चेहरा नहीं है.
    आपके विचार से देश तो ऐसे है तथाकथित धर्मनिरपेक्ष लोगों को मजा चखने के लिए मोदी के पिछे हो गया है. मानो उनको किसी सपने से कोई लेना देना ही नहीं है.
    एड दिनेश शर्मा, नागपुर

    उत्तर द्याहटवा
  6. पायाभूत मतदानाची टक्केवारी पेक्षा बदलता मतदार किंवा कुंपणा वरचा मतदार निवडणूका फार मोठ्या मताधिक्याने जिंकून देत असतो. अशा लोकांसंबंधात लेखातील निष्कर्ष पूर्णपणे लागू होतात. यामुळेच लेखकाला मोदींच्या वीजयाची शक्यता वाटत आहे. ही लेख मालिका अभ्यासपूर्ण वाटते,

    उत्तर द्याहटवा