गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूष इतके क्षुल्लक नसतात

सामर्थ्य आहे चळवळीचे (४)

  समर्थ रामदासांनी पुन्हा मुर्तीपूजेचे थोतांड सुरू केले, असाही एक आक्षेप असू शकतो. पण त्यात तथ्य नाही. सवाल देवळातल्या देवाचा वा त्यातल्या मुर्तीचा नाही. गावोगावी अशा देवळांची स्थापना ही प्रतिकात्मक होती. त्यातून त्या त्या गावात वस्तीमध्ये अस्मितेची प्रतिके त्यांना उभारायची होती. त्यामागे त्या मुर्तीचे थोतांड उभे करण्यापेक्षा तिला अस्मितेचे प्रतिक बनवून तिच्या संरक्षणार्थ उभे ठाकण्याची प्रेरणा स्थानिक पातळीवर रुजवण्याचा हेतू महत्वाचा होता. माणूस कुठल्या तरी अभिमान स्वाभिमानासाठीच लढायला उभा रहातो आणि त्यासाठी अशी प्रतिके मोलाची कामगिरी बजावत असतात. आजही आपल्या देशाच्या सीमेवर थंडीवारा सोसत उभा असलेला जवान सैनिक तिरंगा नावाच्या एका प्रतिकासाठीच लढत असतो आणि आपले प्राण ओवाळून टाकत असतो. तेव्हा तेही एक कापडच असते. त्या झेंड्याला आपला बचाव करता येत नसेल, तर त्याची महत्ता ती काय; असे आपण म्हणत नाही. कारण ते हिदूस्तानच्या अस्मितेचे प्रतिक असते. तसेच धर्मस्थान वा श्रद्धास्थान हे निव्वळ प्रतिक असते. कधी सजीव तर कधी निर्जीव असते. त्याच्यात कुठली चमत्कारी शक्ती नसते. त्यातला चमत्कार त्याच्यासाठी लढायला उभ्या ठाकणार्‍या समाज समुहामध्ये दडलेला असतो. म्हणूनच धर्मस्थान वा देवळाची महत्ता सामुहिक जीवनात मोठी असते. दोन दशके उलटून गेल्यावरही अयोध्येत उध्वस्त करण्यात आलेल्या निरूपयोगी अवशेषरुपी बाबरी मशीदीचे तेच कौतुक आहे. आजही मुस्लिम त्यासाठी अश्रू ढाळत असतात व कुठल्याही स्तराला जाऊन आक्रोश करीत असतात. कारण त्या स्थानाला अस्मितेचे रुप आहे. समर्थांनी नव्याने देवळांच्या उभारणीची मोहिम हाती घेतली, कारण त्यांच्याच समकालीन शिवरायांनी धर्मासह भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे कंकण हाती बांधले होते. त्या संस्कृतीच्या अस्मितेची प्रतिके जागोजागी उभी करून समाजातला स्वरंरक्षणाचा पुरूषार्थ जागवणे; हा त्याचा एक हेतू होता. तसाच एकूण हिंदू समाजातील क्षात्रवृत्तीचे पुनरुत्थान हा दुसरा हेतू त्यामागे होता. अशा रितीने आपल्या वस्तीतले गावातले अस्मितेचे प्रतिक जपायला पुढे येण्यातून जी लढावूवृत्ती जोपासली जाणार होती, तीच पुढे सैनिक होऊन शिवरायांच्या सैन्यात भरती व्हायला हातभार लावणार होती.

   थोडक्यात समर्थांनी आपली अध्यात्मिक चाकोरी सोडून राजकीय, सामाजिक वाट चोखाळली होती, तर शिवरायांनी राजकीय सत्तेत राहुन परमार्थाची सामाजिक जबाबदारी उचलली होती. दोघेही चाकोरी सोडून एकाच कालखंडात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कामाला लागले होते. या दोघांनी परस्पर पुरक कार्य आरंभले होते आणि त्यांच्या कुठल्याही काम वा कृतीने एकमेकांच्या उद्दीष्टाला छेद दिला नाही. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदून जाऊ शकले नाहीत. म्हणूनच महाराष्ट्राचाच नव्हेतर भारतवर्षाचा इतिहास बदलून गेला. सभोवारचे अनेक देश व राष्ट्रे, समाज आपली परंपरा, वारसा व इतिहास गमावून बसले; त्याच काळात हिंदूस्तानला मात्र आपली ओळख व वारसा टिकवता आलेला आहे. आफ़्रिकेपासून मलेशियापर्यंत सभोवारच्या भूगोलाचा ऐतिहासिक चेहरामोहराच बदलून गेला. आज तिथल्या समाजाला आपलीच पूर्वपुण्याई आठवू शकत नाही, अशा प्रदिर्घ कालखंडात भारताचा चेहरामोहरा कायम राहू शकला. त्यामागे महाराष्ट्रातील या दोघा महापुरूषांची दूरदृष्टी व दुर्दम्य इच्छाशक्तीच कारणीभूत झाली आहे. मग ते परस्परांशी संबंधित होते, गुरूशिष्य़ होते किंवा सहकारी होते, असल्या वादाला अर्थच उरत नाही. दोघांनी साधलेले परिणाम अभूतपुर्व आणि कौतुकास्पद आहेत. त्यांच्यातले वाद व वितुष्ट शोधणार्‍यांना आज इतिहासाचा अभ्यास वा छाननी करता येते; त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी भारतीय अस्मितेला सुखरूप राखण्यासाठी केलेले परस्पर पुरक व संयुक्त प्रयास हेच आहे. दोघेही परस्परांच्या शत्रूसारखे वागले वा जगले असते; तर आपलीही अवस्था पाकिस्तान वा इराण, इजिप्तसारखी होऊन आपण ऐतिहासिक वारशाबद्दल बोलूही शकलो नसतो. उलट शेकडो वर्षापुर्वी कधीकाळी अरबी प्रदेशात इस्लामच्या आरंभ काळात जे पंथ निर्माण झाले, त्याच्या अभिमानाने प्रेरित होऊन शिया-सुन्नी अशा वैरासाठी एकमेकांच्या उरावर बसलो असतो. समर्थ रामदास ब्राह्मण होते किंवा शिवराय मराठा होते, त्यामुळे त्यांच्या जातीची अस्मिता घेऊन आपण भांडूही शकलो नसतो. कारण आपली तशी जातीची वा वारशाची ओळखही आपण केव्हाच विसरून गेलो असतो.

   ज्या जातीय भेदभाव वा पक्षपाताच्या भूमिकेत आजचे काही विद्वान वा या महापुरूषांचे पाठीराखे एकमेकांची उणीदुणी काढत असतात आणि त्यासाठी त्याच महात्म्यांची नावे घेत असतात; त्यांना त्या थोरपुरूषांच्या जीवनाचे उद्दीष्ट व सार कितपत कळले आहे, याचीच मग शंका येते. हे त्यांचे भक्त वा अनुयायी ज्या आवेशात एकमेकांच्या अंगावर जात असतात व परस्परांना नामोहरम करीत असतात, तसेच तेव्हा त्या दोघांनी केले असते; तर आज समर्थ रामदास किंवा शिवराय असली नावेही आपल्याला आठवली नसती. ती आपल्याला आठवतात, स्मरणात आहेत, कारण त्यांनी आपल्या कार्यकाळात परस्परांना पुरक असे समाज जोडायचे व समाज उभा करण्याचे संयुक्त कार्य पार पाडलेले आहे. आजच्या जातीय अस्मितेचीच कास धरत त्यांनीही परस्परांच्या विरोधातली लढाई केली असती; तर कोणी मराठा राहिला नसता किंवा कोणी ब्राह्मणही राहिला नसता. इथेही शिया-सुन्नी असल्या रक्तरंजित संघर्षात आपणही अस्मिता गमावल्यासारखे भरकटत गेलो असतो. शिवराय, समर्थ रामदास किंवा ज्ञानेश्वर-तुकोबा ही इतकी प्रचंड व्यक्तीमत्व असतात, की त्यांचे आकलन होण्यापुर्वीच आपले आयुष्य़ संपून जाऊ शकेल. अमावस्येचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र जसे भिन्न दिसतात, तसे आपण या महापुरूषांना भिन्न स्वरुपात पाहून त्यावरूनच भांडत बसतो. पण त्यांच्या कार्याची महती वा त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा थांग आपल्याला लागलेला नसतो. म्हणूनच त्यांच्यातले गुण व त्यांची शिकवण आत्मसात करण्यापेक्षा आपण त्यांच्यात काय नव्हते, याचा शोध घेऊन चिखलफ़ेक करण्यात धन्यता मानू लागतो. तिथेच मग आपण त्यांचाच पराभव करीत असतो. त्यांच्याच महान कार्याची व इतिहासाची विटंबना करीत असतो. लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीने सागराला घागरीचे क्षुल्लक रूप देत असतो. शिवराय किंवा समर्थ रामदास यांचे ऐतिहासिक कर्तृत्व सागरासारखे अथांग अफ़ाट असते, तो महासागर उपसण्यापेक्षा त्यातली रत्ने माणके शोधावीत. इतक्या पराक्रमी व कर्तबगार थोरपुरूषांच्या संरक्षण वा समर्थनासाठी आपल्यासारख्या क्षुल्लक लोकांनी धावावे; इतके ते छोटे नसतात. आपणही आपल्या मोठेपणासाठी त्यांना छोटे करू नये, इतकेच सांगावेसे वाटते. (समाप्त)

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

इतिहास घडवतात ते महापुरूष

सामर्थ्य आहे चळवळीचे (३)

   इतिहास घडत असतो, तसाच घडवला जात असतो. बहुतांश लोक इतिहास घडेल तसे बघत बसतात आणि त्याला शरण जातात. पण मोजकेच लोक असे असतात, जे इतिहासाची मनमानी स्विकारत नाहीत. ते इतिहासाला वळण देऊ बघतात, त्यासाठी झुंजतात. शिवराय आणि समर्थ रामदासांचा कालखंड बघितला तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात इतिहासाला शरण गेलेल्या समाजात इतिहासाशी झुगारणारे तरूण उदयास आले. शिवरायांच्या समकालीन अनेक मराठे व हिंदू राजांपाशी शौर्य होते. पण इतिहासाला गवसणी घालून त्याला वेगळा आकार देण्य़ाच्या इच्छेचा त्यांच्यामध्ये अभाव होता. जी सरंजामशाहीची चाकोरी अनेक पिढ्यांपासून तयार झालेली होती, ती सोडण्याची इच्छाच तेव्हाचे अनेक सरदार जहागिरदार गमावून बसले होते. अशावेळी शिवराय त्या ऐषारामी जीवनाला झुगारण्यास पुढे सरसावले. त्यांनी चाकोरी सोडून बलाढ्य वाटणार्‍या बादशहा, सुलतानांच्या सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रस्थापित सरदारांची मदत मागण्यापेक्षा त्यांनी नव्या दमाच्या तरूणांना हाताशी धरले आणि त्यातूनच नवे सरदार लढवय्ये उभे केले. पारंपारिक युद्धाची निती ही सत्ता किंवा संपत्ती, धनदौलत संपादन करण्याची होती. पण शिवरायांची निती त्यापासून अगदीच भिन्न म्हणजे चाकोरीला छेद देणारी अशी आढळते. त्यांनी उभे केलेल्या सामाजिक नेतृत्वामध्ये अस्मितेची धार दिसते. तशी धार तात्कालीन अन्य कुठल्या राजा, सरदाराच्या सेनेत किंवा सहकार्‍यांमध्ये आढळून येत नाही. आपले राज्य स्थापन करावे आणि आपण राजा व्हावे म्हणून त्यांनी लोकांना लढायला आमंत्रित केले नाही. सामुहिक अस्मितेसाठी व तिच्या संरक्षणासाठी लढणारे तरूण शिवरायांनी उभे केले. त्यांच्या सवंगड्यांच्या कथा त्याची साक्ष देतात.

   लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे, असे म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे किंवा आधी लगीन कोंडाण्य़ाचे, असे बोलून गेलेला तानाजी मालुसरे, निव्वळ टाळ्या मिळवणारी चमकदार वाक्ये बोललेले नाहीत. त्यातून त्यांनी शिवरायांच्या राजनितीचेच पाठ सांगितले आहेत. लाख मेले तरी चालतील, म्हणजे सामान्य सैनिकापेक्षा राजवंशाची महत्ता बाजीप्रभू सांगत नव्हता. तर शिवरायांसारखा दुर्मिळ नेता हरपला तर अवघी स्वराज्याची चळवळच संपुष्टात येईल, असेच त्याला म्हणायचे होते. आपल्यासारखे लढणारे शेकडो मिळतील, निर्माण होतील, पण शिवरायांसारखा प्रेरणादायी नेता क्वचितच कुणा समाजाला मिळतो, तो गमावून चालणार नाही; असेच त्याला म्हणायचे होते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिवराय त्याला सुखरूप सोबतच घेऊन जायला उत्सुक आहेत व तसे सांगत आहेत. पण खुद्द राजाच्या आदेशाची बाजीप्रभू एकप्रकारे अवज्ञाच करतो आहे. कारण त्याच्यासारख्या सहकार्‍याला गमावण्याच्या चिंतेने राजा भावुक झालेला होता. तो आपली अवज्ञा करीत नसून आपल्याला कर्तव्याची जाणिव करून देतो, हे समजण्याइतके शिवराय प्रगल्भ होते. तर आधी लगीन कोंडाण्याचे म्हणणारा तानाजीही महाराजांना स्वराज्याच्या चळवळीतील प्राधान्याची आठवण करून देतो आहे. खुद्द महाराज रायबाच्या लग्नसोहळ्यानंतर कोंडाण्याच्या मोहिमेचे बोलतात. पण तानाजी त्यांना नकार देतो आणि महाराजही ते मान्य करतात? राजाची अवज्ञा वाटण्यासारखी तीसुद्धा घटना आहे. पण त्यातून स्वराज्याची लढाई, ही तात्कालीन राजकीय सामाजिक उत्थानाची कशी प्रभावी चळवळ होती, त्याचीच साक्ष मिळते. जेव्हा असे सहकारी महाराज शोधतात व निवडतात, तेव्हा त्यामागची प्रेरणा किती संन्यस्त होती, याचेच दाखले मिळतात. असे सरदार, सहकारी शिवरायांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी लढत नव्हते, तर एका समाजाच्या अस्मितेचे पुनरुत्थान करण्यासाठी कंबर कसून उभे राहिलेले होते. एकूणच त्या कालखंडाचे परिशीलन केल्यास जाणवते, की तो इतिहास एका चळवळीचा होता. त्यात लढाईचे वा मनगटाचे, तलवारीचे सामर्थ्य काम करीत नव्हते; तर चळवळीचेच सामर्थ्य ओळखून स्वराज्याची मुहूर्तमेढे रोवली गेली होती. त्याच कालखंडातले संन्यासी समर्थ रामदासही स्वराज्याचा मंत्र देत फ़िरतात आणि अध्यात्मातून तीच ज्योत पेटवत जातात, हा योगायोग नसतो.

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे

   हे समर्थांचे शब्द नेमके त्या घडामोडींशी जुळणारे का असावेत? मग त्यांच्याकडून घेतलेल्या अनुग्रहानंतर शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती काय? मुळात महाराजांनी समर्थांना गुरू तरी मानले होते काय? असले वाद आता खेळण्यात अर्थ नाही. कारण त्यातला बारीकसारीक तपशील इतिहासजमा झालेला आहे. महत्वाचे आहे, ते त्यातून साधले गेलेले ऐतिहासिक परिणाम. कारण या दोघा महापुरूषांनी केलेले परस्पर पुरक कार्य मराठी व हिदूस्तानी समाजाचे अपुर्व असे पुनरुत्थान करून गेलेले आहे. जेव्हा समस्त हिंदुस्तानातील बिगर इस्लामी स्थानिक राजसत्ता मोडकळीस आलेल्या होत्या आणि लढण्याची कुवत हरवून बसल्या होत्या;  त्याच कालखंडात या दोघा महापुरूषांनी या खंडपाय देशाची अस्मिता सामर्थ्याने प्रतिकारासाठी उभी करण्याचे महान कार्य केलेले आहे. सातव्या शतकानंतर जेव्हा इस्लामी फ़ौजा धर्मप्रसारासाठी हाती शस्त्र घेऊन चौफ़ेर उधळल्या; तेव्हा त्यांच्या टाचेखाली जगातल्या अनेक समाज-संस्कृती पुरत्या जमीनदोस्त होऊन गेल्या. आज त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. अनेक समाज व राष्ट्रे आपला वारसाच गमावून बसली आहेत. अस्मिताही हरवून गेली आहेत. कधीकाळी आपापल्या उत्क्रांत धर्म संस्कृती परंपरांमध्ये उन्नत झालेल्या शेकडो लहानमोठ्या समाजांच्या खाणाखुणा आज आशियासह आफ़्रिका खंडातून बेपत्ता होऊन गेल्या आहेत. सुमेरियन वा बायझंटाईन, पर्शियन संस्कृती उध्वस्त होऊन गेल्या आहेत. जगातले अदभूत रहस्य मानल्या जाणार्‍या पिरॅमिडसारख्या उन्नत संस्कृतीचा वारसा इजिप्शियनांना आठवत सुद्धा नाही. इराण्यांना आपली भरभराटलेली पर्शियन संस्कृती माहितही नाही. अफ़गाणिस्तानची उदात्त बौद्ध संस्कृती नामशेष होऊन गेली. हा सर्व विध्वंस होत असतानाच्या काळातच भारतीय व हिंदू संस्कृतीलाही ग्रहण लागलेले होते. पण तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडायला कुणी सामर्थ्यवान या उपखंडातून पुढे यायला राजी नव्हता. पण तरीही आज ती कित्येक शतकांचा वारसा सांगणारी भारतीय संस्कृती टिकून राहिली, त्याचे श्रेय महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आलेल्या दोन महापुरूषांचे आहे आणि त्यांच्या परस्पर पुरक सामाजिक आध्यात्मिक कार्यालाच आहे. ते समकालीन शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासच होत. कारण त्यांनी अन्य पौर्वात्य देशांप्रमाणे इस्लामी आक्रमणाला शरण जाऊन नष्ट होण्यास नकार दिला आणि प्रतिकाराची चळवळ इथे रुजवली व जोपासलेली होती. त्यातून त्यांनी इतिहासाला वेगळे वळण देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

   तसे संत परंपरेतूनही याच धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणाला सशस्त्र नव्हेतर सामुहिक प्रतिकार करण्याचे आंदोलन त्याच आधीच्या कालखंडात सुरू होते. मुस्लिम नसणे वा इस्लामचा स्विकार केला नाही, तर नागरिकांना आपल्याच जन्मभूमीत दुय्यम व पक्षपाती वागणूक देण्याचा जो अन्याय सुरू झाला होता, त्याला तोंड द्यायला संतांनी कंबर कसली होती. एकेकट्या पडलेल्या समाजाला त्यांनी वारकरी बनवून धर्मापेक्षाही आपला सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या मोहिमा चालविल्या. एक जमाव आपल्या देवधर्माचा जयघोष करीत उजळमाथ्याने घराबाहेर पडून मैलोगणती यात्रा करीत पंढरपुराला जाऊ लागला. मग जिथे म्हणून त्याचा मुक्काम पडायचा, तिथे गावातले लोक वारकर्‍यांची सेवा पाहुणचार म्हणून शेवटी आपल्या धर्माची व संस्कृतीचीच पाठराखण करायला निर्भयपणे घराबाहेर पडू लागले. थोडक्यात देवळातला देव धोक्यात आला, तेव्हा याच संत परंपरेने मनातली धर्माची व संस्कृतीची अस्मिता जपण्याची सामुहिक मोहिम चालविली होती. ती सुद्धा चळवळच होती. भारतातले धर्म मुळातच संघटित स्वरूपातले नव्हते आणि आक्रमक परके तर संघटित धर्माची व धर्मप्रसाराचीच मोहिम घेऊन अंगावर आलेले. त्यातून धर्म व संस्कृती जगवण्याचा प्राथमिक प्रयास केला, तो संत परंपरेने. पुढे त्या जगवलेल्या संस्कृती व धर्माच्या अस्मितेतून क्षात्रधर्माचे स्फ़ुल्लींग पेटवण्याचे काम शिवाजी महाराज व समर्थांनी शिरावर घेतले. तिथून संत परंपरा खंडीत झाल्यासारखी दिसते. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सामुहिक चळवळीचे इतिकर्तव्य तिथे थांबले. कारण देवळांचे संरक्षण करणारा समर्थ राजा व योद्धा उदयास आला होता. म्हणून की काय, त्याच संत परंपरेची धुरा पुढल्या काळात देवळांची नव्याने उभारणी करणार्‍या समर्थांकडे आलेली दिसते. गावोगावी त्यांनी नव्याने देवळांची, देवस्थानांची उभारणी करण्याची मोहिम हाती घेतली. (अपुर्ण)

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

इतिहासातले ते अजोड उदाहरण

सामर्थ्य आहे चळवळीचे (२)

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांचे परस्पर पुरक कार्य

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांची शोकांतिका

ज्ञान की जैसे सीमा ज्ञानी
गागर मे सागर का पानी

   ‘आम्रपाली’ नावाचा सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट चार दशकांपुर्वी येऊन गेला. त्यामध्ये लतादिर्दींच्या स्वरातील एका गीतामधल्या या ओळी आहेत. कवीचे हे बोल अतिशय उदबोधक आहेत. विद्वान किंवा बुद्धीमंत स्वत:ला सर्वज्ञानी समजत असतो. त्याला अवघ्या जगाचे ज्ञान प्राप्त झाले अशीच त्याची समजूत असते. म्हणूनच आपणच ज्ञानाची सीमा किंवा हद्द आहोत; अशी त्याची ठाम समजूत असते. आपल्याला जेवढे उमगले आहे, त्यापेक्षा विश्वात आणखी काहीच ज्ञान नाही; म्हणूनच आपण ज्ञानाची परीसीमा आहोत, अशी त्याची धारणा असते. पण ती कितपत सत्य व वास्तव असते? विशाल सागराचे पाणी घागरीत भरून घ्यावे आणि त्यालाच सागर समजावे, असेच ते अ‘ज्ञान’ असते. कारण घागरीतल्या पाण्याच्या अनंत पटीने सागर शिल्लक असतो आणि कुठल्याही घागरीत वा पात्रामध्ये मावणार नाही; असे त्याचे अथांग आकारमान असते. पण त्याचे भान सुटले, मग व्यक्ती स्वत:ला ज्ञानाची परीसीमा मानू लागते. ज्ञानाचा विद्वत्तेचा अहंकार चढलेल्या बुद्धीमंताची ही स्थिती असेल, तर मग त्याच्या अनुयायाची किंवा भक्ताची अवस्था काय असू शकते? त्याला तर आपला गुरू वा बुद्धीमंत स्वामीच सर्वव्यापी व जगाचा नियंता वाटू लागतो. पण प्रत्यक्षात त्याच्या गुरूचे ज्ञानच घागरीत मावेल, इतक्या सागराच्या पाण्यासारखे क्षुल्लक असते. पण स्वामी वा गुरूपेक्षा त्या अनुयायी भक्ताचा अहंकार अधिक मोठा असतो. त्याला तर अवघ्या जगाचे ज्ञानच आपल्या मुठीत बंद झाल्यासारखे वाटत असते. त्याबद्दल चर्चा वा चिकित्साही करायची त्या भक्ताची तयारी नसते. आणि असे कोणी सामान्य बुद्धीचे भक्तगण असतात असेही मानायचे कारण नाही. त्या भक्ताला साक्षात त्याच्या गुरू वा स्वामीनेही सत्य सांगायचा प्रयास केला, तरी भक्त त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. गुरूला मान्य असलेली स्वत:मधली त्रुटीही, त्याच्या भक्ताला मान्य होऊ शकत नाही. ही जगातील वास्तविकता आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक सेन्ट मार्टीन ल्युथर त्याचीच साक्ष देतो. तो म्हणतो,

    ‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्या समोर मांडले गेले आहे, त्यावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्द न शब्दाला आपण धट्ट धरून रहायला हवे असे मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी स्वर्गातून खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले, तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत, म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन’. असे म्हणणारा सेन्ट मार्टीन ल्युथर कोण आहे आणि कोणाची शिकवण तो सांगतो आहे? ख्रिस्ताची शिकवण म्हणजे त्या प्रेषीताला स्वर्गातल्या देवदूतांनी दिलेले संदेशच होत. म्हणजे ख्रिस्ताला देवदूतांनी जे सांगितले असे त्यानेच नव्या करारातून सांगितले आहे; त्यात देवदूतालाही दुरुस्ती करण्याची मोकळीक हा ख्रिस्ताचा अनुयायी द्यायला तयार नाही. कुठल्याही अनुयायाची व भक्ताची हीच अवस्था असते. त्याला उमगलेले ज्ञान वास्तवाशी निगडीत असायचे कारण नसते. आणि कुठल्याही महापुरूष व महात्म्याची अवस्था नेमकी अशीच असते. त्याच्या अनुयायांना तो जसा व जितका आकलन झाला आहे, त्यापेक्षा वेगळा असायची मुभा भक्तही त्या स्वामी, परमेश्वर किंवा गुरूला, महापुरूषाला देत नसतात. तिथे आपल्यासारख्या सामान्यजनांची काय कथा?


   विचार तत्वज्ञानाची ही़च तर शोकांतिका असते. त्यामागे ताकद नसते, तेव्हा ते निर्जीव निष्क्रिय दुर्लक्षित पडून रहाते. त्याच्या मागे ताकद उभी राहिल्याशिवाय त्याची परिणामकारक सिद्ध होत नाही. पण ती ताकद म्हणून जी झुंड उभी रहाते, त्या झुंडीच्या आकलनानुसार त्या विचार किंवा तत्वज्ञानाचा व्यवहारी अविष्कार होत जातो. त्यात पहिला बळी पडत असतो, तो ज्याने विचार मांडले खुद्द त्याच विद्वानाचा. कारण त्याचे अनुयायी म्हणवणारे त्या थोरपुरूषाच्या नावावर स्वत:चे आकलनच सक्तीने लोकांच्या गळी मारायचा उद्योग भरभराटीस आणतात. अशा आक्रमक शक्तीशाली आकलनाखाली वास्तविक मुळचा विचार गाडला जात असतो. म्हणूनच मानवी इतिहासात बहुधा कुठलाही विचारवंत वा महापुरूष, महात्मा आपल्याच अनुयायांच्या तावडीतून सुटू शकलेला नाही. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. आज विविध पातळीवर होणार्‍या चर्चा, वादविवाद किंवा आंदोलने व संमेलने, यातला विसंवाद त्यातूनच आलेला दिसेल. अगदी एकाच विचारधारेचे पाईक एकमेकांवर धावून जाण्याइतके परस्पर विरोधी दावे करीत असतात. समान विचारधारेचा वारसा सांगणारेच एकमेकांचे असे शत्रू का होतात; असा आपल्याला अनेकदा संभ्रम होतो. त्याचे हेच कारण आहे. त्या विचारांचे भिन्न आकलन त्या अनुयायांना एकमेकांच्या विरोधात उभे करत असते. जसे एकाच घरातले भाऊबंद पराकोटीचे दुष्मन व्हावेत, पण एकाच मूळपुरूषाचा वारसा सांगत त्याच्या मालमत्तेवरचा मक्तेदार हक्क सांगत भांडावेत, तसे हे एकाच विचारधारेचे अनुयायी भाऊबंदकी करताना दिसतात. त्याला विचारातील विरोधाभास नव्हे, तर आकलनातला विरोधाभास कारण होत असतो. असे अनुयायी मूळपुरूषाचा वारसा सांगणारे असतात, तरी दुसर्‍या तिसर्‍या पिढीतल्या आपल्या अत्यंत निकटच्या जन्मदात्याचाच वारसा घेऊन लढायला उभे ठाकलेले असतात. इथे विचारधारेचे अनुयायी सुद्धा तसेच समोरासमोर उभे ठाकलेले दिसतील. ते मूळ विचारवंत महापुरूषाचा वारसा तोंडाने सांगत असले, तरी ज्याचे आकलन स्विकारलेले असते, त्याच्या बाजूने लढायला उभे राहिलेले असतात. म्हणूनच मग समान विचारधारेचे अनुयायीच परस्पर विरोधी दावे करीत हमरातुमरीला आलेले दिसतात. त्यातून त्याच विचारधारा किंवा परंपरेचे धिंडवडे काढण्यात पुढाकार घेत असतात. त्याच विचारांची व तत्वांची अक्तरे करीत असतात.

   भारताच्याच नव्हेतर जगाच्या इतिहासात त्याची शेकडो उदाहरणे सापडतील. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्या इतिहासात शेकडो महात्मे उदयास आले आणि त्यांनी आपापल्या परीने चिंतन करून या समाजाला उन्नत करण्याचा आपापल्या मार्गाने प्रयास केलेला आहे. कोणी निव्वळ चिंतन, तत्वज्ञानाने तर कोणी हाती शस्त्र घेऊन अस्मितेच्या रुपाने, कोणी विविध प्रकारचे संशोधन व अभ्यासातून समाजाची उन्नती घडवली, तर कोणी वैचारिक सामाजिक उत्थानातून देशाला घडवण्याचा प्रयास केलेला आहे. त्या त्या कालखंडातील परिस्थिती व साधनांच्या उपलब्धतेनुसार त्यांनी कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांना आपण महात्मे, महापुरूष, चिंतक म्हणून ओळखतो, अशा प्रत्येकाचा प्रयास समाज व देशाला उन्नतीकडेच घेऊन जाण्याचा होता. दुर्दैवाने त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी, पाठीराख्यांनी किंवा शिष्यांनीच त्यांचा पराभव केलेला दिसतो. ज्या जंजाळातून समाजाला मुक्त करण्याचे प्रयास त्या महात्म्यांनी केलेले असतात व त्यासाठीच आपले जीवन समर्पित केलेले असते; त्यांच्याच विचार व उत्थानाच्या तत्वांचा उपयोग पुन्हा त्या समाजाला प्रथा परंपरांच्या जंजाळात गुरफ़टून टाकण्यासाठी होत असतो. मात्र त्यासाठी त्या महात्म्यांच्या विचार व चिंतनाचे जसे ज्याला आकलन झाले, त्याचाच अशी वारस व्यक्ती एक जंजाळ बनवते आणि त्यालाच प्रतिक बनवून त्याचा मायाबाजार बनवत असते. अशारितीने मग त्या महात्म्याला बाजूला टाकून अनुयायीच स्वत:चे महात्म्य निर्माण करीत असतात. त्यासाठी मग दुसर्‍या कुणा महात्म्याची खिल्ली उडवली जाते. दोन वा अधिक महापुरूषांमध्ये भिंती उभारल्या जातात. त्यांचे विचार परस्पर विरोधी वा एकमेकांसमोर युद्धाच्या तयारीत उभे केले जातात. असे महापुरूष एकमेकांचे शत्रू होते किंवा त्यांच्यात वैरभावना होती, असे आभास निर्माण केले जातात. पण वास्तवात पाहिल्यास सर्वच महात्म्यांनी परस्पर विच्छेदक भूमिका न घेता, परस्पर पुरक समाज उत्थानाचेच कार्य केलेले दिसते. त्यांच्या दिशा भिन्न वा छटा वेगवेगळ्याही दिसतात. पण एकूणच मानव जात किंवा समाजाच्या उन्नती वा भल्यासाठीच त्यांनी कार्य केलेले दिसते. मात्र ते सत्य मानले व त्यानुसार वाटचाल केली, तर त्याच तत्वांचे व विचारांचे मायाबाजार उभे करणार्‍यांची दुकाने बंद होण्याचा धोका असतो. म्हणूनच या दुकानदारांना महात्मे व महापुरूष एकमेकांच्या विरोधात युद्धसज्ज अवस्थेत आणून उभे करावे लागतात. ज्यांनी समाज जोडायचे काम केले, त्यांनाच समाज तोडण्याचे हत्यार म्हणून उभे धार लावली जाते. (अपुर्ण) 

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

मोदींपेक्षा राहुल ‘भारी’



  अलिकडल्या काही दिवसात राहुल गांधींनी जाहिरसभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जबरदस्त धक्का दिल्याच्या फ़ेसबुकवरील प्रतिक्रिया आणि एकूणच वाहिन्यांवरील चर्चा ऐकल्यावर मनापासून हसू आले. पहिली गोष्ट अशी, की समोर दिसते म्हणून आपण बघतोच असे नसते आणि कानावर पडलेला प्रत्येक आवाज आपण ऐकतोच असेही अजिबात नसते. त्यातले आपल्याला हवे तेच आपण बघत असतो आणि हवे तेच ऐकत असतो. पुन्हा त्यातून आपल्याला हवे तसेच अर्थ लावत असतो. राहुलने आपल्या आक्रमक भाषणातून मोदींना दणका दिल्याची प्रतिक्रिया म्हणूनच नवलाईची आहे. काहीजणांना तर मनमोहन देसाईच्या ‘अमर अकबर अंथोनी’ चित्रपटातला अमिताभही आठवला. त्यात विनोद खन्नाकडून जबर मार खाल्ल्यावर पोलिस कोठडीत जाऊन पडलेला अमिताभ उर्फ़ अंथोनी म्हणतो, ‘तुमने हमको बहुत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड मारा; है की नही?’ लोकांच्या लक्षात राहिलेले ते वाक्य जरूर आहे. पण त्यानंतर अंथोनी गजाआड जाऊन पडलेला असतो. तर त्याला गजाआड टाकणारा विनोद खन्ना उर्फ़ अमर शिरजोर ठरलेला असतो. तेव्हा त्यातला अंथोनी विनोदी नव्हेतर निर्लज्ज व हास्यास्पद ठरलेला असतो. मग अशा उदाहरणातून आपण राहुल गांधींचे कौतुक करतोय, की टवाळी करतोय; हे त्यांच्या चहात्यांच्या लक्षात कधी यायचे? कसे येणार? त्यांना समोर दिसते आहे, त्यापेक्षा भलतेच बघायचे व ऐकायचे असेल, तर सत्य दाखवणार तरी कसे? अलिकडल्या काळात अंथोनीचे हे वाक्य अनेक राजकीय अभ्यासकांच्या लक्षात राहिले, कारण मागल्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागल्यावर साडेचार वर्षापुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यातले व्यंग दाखवण्यासाठी ते उच्चारले होते. ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना खिजवण्यासाठी. त्यात विजयी सूर नव्हता, तर आपण आपटलो, तरी तुम्हाला भूईसपाट करीत आपटलो; असा त्याचा मतितार्थ होता. त्याही अर्थाने राहुलच्या हल्लीच्या सभेचे वर्णन वा विश्लेषण होऊ शकते काय? होणार असेल तर मोदींना संपवताना राहुल कॉग्रेसच संपवायला निघालेत असा घ्यायचा काय?

   मागल्या काही महिन्यांपासून मोदी देशाच्या विविध राज्यामध्ये जाहिरसभा घेत आहेत. भव्यदिव्य विराट सभा बघून खुद्द भाजपातल्याच जाणत्यांना नवल वाटत असेल, तर मोदी व भाजपा विरोधकांच्या पोटात गोळा येणे स्वाभाविकच आहे. कारण मोदींना गुजरातबाहेर कोणी ओळखतसुद्धा नाही, असाच त्यांच्या विरोधकांना मागली दोनतीन वर्षे दावा राहिलेला आहे. मोदींच्या पंतप्रधानकीच्या दाव्याची गोष्ट निघाल्यावर, त्यामुळे भाजपाचे नुकसान होईल; असेही वारंवार सांगितले जात होते. पण आपल्या नावाची पंतप्रधान पदासाठी घोषणा झाल्यापासून मोदींनी देशाच्या कानाकोपर्‍यात सभांचा सपाटा लावला आहे. त्यासाठी जमणारी गर्दी अचंबित करणारी असली, तरी त्या गर्दीकडून मोदींच्या विधाने व वक्तव्यांना मिळणारा प्रतिसाद विरोधकांना अस्वस्थ करून सोडणारा असल्यास नवल नाही. ज्याच्या विरोधात अखंड अकरा वर्षे बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या; तोच देशातला सर्वाधिक लोकप्रिय नेता होताना बघायला कुठल्या बुद्धीमंताला आवडू शकेल? आपले सिद्धांत व आग्रह खोटे पडताना बघणे, कुणाही विद्वानाला आवडणे शक्यच नसते. सहाजिकच मोदींच्या गाजणार्‍या मोठमोठ्या सभा सेक्युलर लोकांना पोटदुखी झाल्यास नवल नव्हते. अशावेळी मग मोदींच्या या घोडदौडीला कोणी रोखू पहात असेल किंवा त्यात पुढाकार घेत असेल; तर त्याचे मोदी विरोधकांना कौतुक नक्कीच वाटणार आणि त्यात गैर काहीच नाही. त्यामुळेच मागल्या काही दिवसात कॉग्रेसचे अननुभवी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लागोपाठ सभा घेऊन भाजपाच्या नावाने व मोदींचे नाव न घेताच केलेल्या हल्ल्याने अशी माणसे सुखावली तर आश्चर्य नाही. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशीच ही स्थिती असते. बुडणार्‍याला काडी कधीच वाचवू शकत नाही, हे सत्यच आहे. पण तरंगणारी काडी बुडणार्‍याला आशा तर दाखवते ना? त्यापेक्षा राहुलची भाषणे फ़ारशी उपयोगी वा परिणामकारक नाहीत.

   सभेत आवेशपुर्ण व चढ्या आवाजात बोलले, मग भाषण आक्रमक झाले; अशी अनेकांची समजूत आहे. खुद्द राहुलचीही अशीच कोणीतरी समजूत करून दिलेली दिसते. अन्यथा त्यांनी कुठल्याही अनावश्यक शब्दांवर जोर देत असा आक्रस्ताळेपणा केला नसता. आपल्या आजी व पित्याची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली आणि आपल्याला त्याचा घुस्सा येतो; असे राहुलनी म्हणायला काहीच हरकत नाही. पण जो आवेश त्यांनी इतक्या वर्षांनी दाखवला, तो नाट्यमय होता. त्याच्या बुमरॅंग होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. अन्य कोणी त्यांना त्यातले धोके दाखवण्याचे धाडसही केले नाही. त्यापेक्षा त्यांच्या चहात्यांनी टाळ्या पिटून कौतुकच केल्यावर राहुल भरकटत गेल्यास नवल नव्हते. शेफ़ारलेल्या पोराप्रमाणे त्यांनी मुक्ताफ़ळे अधिकच उधळण्यास सुरूवात केली आणि त्यांची अवस्था मग खरोखरच सिनेमातल्या त्या अंथोनी सारखी होऊन गेली. राजस्थानातील सभेत ‘दादी को मारा, पापा को मारा’ असल्या पोरकटपणाचे पुढले पाऊल मग इंदूरच्या सभेत पडले. आधीच्या सभेत भाजपा जातीय धार्मिक द्वेष फ़ैलावतो आणि ती आग आम्हाला विझवावी लागते, असे सांगितले होते. इतकेच नव्हेतर आग लागली तेव्हा भाजपावाले कुठे होते; असाही सवाल केला होता. पंतप्रधानांसमवेत गेल्याने मुझफ़्फ़रनगरच्या दंगलग्रस्त परिसराला भेट द्यायला गेलेल्या मम्मी पप्पूला तिथे प्रवेश मिळाला. पण त्याच परिसराला भेट द्यायला राहुलच्याही आधी भाजपाचे राज्यसभेतील उपनेते व अध्यक्ष गेलेले असताना, त्यांना मात्र राज्य पोलिसांनी विमानतळावरूनच परत पाठवले होते. म्हणजेच भाजपाच्या नेत्यांची मम्मी युपीएची अध्यक्ष नाही आणि तिच्याच रिमोटवर चालणारा पंतप्रधान नाही; तो भाजपावाल्यांचा गुन्हा असतो काय? गेलेल्यांना रोखायचे आणि मग वर तोंड करून विचारायचे, हे भाजपावाले आग लागली तेव्हा मुझफ़्फ़रनगरात का गेले नाहीत? याला सत्यवचन म्हणतात? इतके असत्य बोलू शकत नसेल तो फ़ेकू असतो. यात फ़ेकू कोण, ते सामान्य जनतेला नेमके कळते. पण बुद्धीमंत सेक्युलर असल्यावर ते कळू शकत नाही. मग मोदीला कसे घेरले, याचा आनंदोत्सव सुरू व्हायचाच. व्हायलाही हरकत नसावी. कोणाला मुर्खाच्या नंदनवनातून बाहेर खेचायला अधिकार आपल्याला राज्यघटना देत नाही ना?

   पण अशा चहात्यांच्या टाळ्या गुंजत असतील व कडकडाट करीत असतील; तर हा आधुनिक राजकारणातला अंथोनी आपल्या हास्यास्पद मुर्खपणाच्या कृती लगेच कशाला थांबवणार? तो अधिकच पोरकटपणा करणार ना? मुझफ़्फ़रनगरच्या स्थानिक पोलिसांनी दंगल कोणी पेटवली, त्यात पोलिसांना काम करण्यात कोणी अडथळे आणले, त्याचे छुपे चित्रण वाहिन्यांवरून लोकांनी बघितले आहे. त्यांना सत्य चांगले ठाऊक आहे. तरीही राहुल गांधी बेधडक खोटे बोलणार असतील; तर त्यांचे तोंड कोणी बांधायचे? ते मोकाटच सुटणार ना? त्यामुळेच मग राहुलनी इंदूरच्या सभेत आणखी एक लोणकढी थाप हाणली. म्हणे त्यांना कुणा गुप्तचर अधिकार्‍याने येऊन सांगितले, की मुझफ़्फ़रनगर दंगलीतल्या पिडीत मुस्लिम तरूणांना पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था हाताशी धरते आहे. थोडक्यात आता दंगलीनंतर तिथले पिडीत मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक बनू लागले आहेत, असाच आरोप राहुलने केला. म्हणजे ज्यांचे आप्तस्वकीय त्या दंगलीत मारले गेले, त्यांच्या जखमांवर फ़ुंकर घालणे दुर राहिले. त्यांचे पुनर्वसन मागे पडले. त्याच मुस्लिमांना पाकिस्तानचे हस्तक ठरवण्याचा अव्यापारेषू व्यापार आधुनिक अंथोनी करून बसले. प्रत्येक दंगल व घातपातानंतर आपल्या देशात पालिस्तानी हस्तक व आयएसआय यांच्यावर संशय घेतला जातो. मग त्यांचे हस्तक म्हणून काही मुस्लिम संशयितही पकडले जातात. त्यामुळे सर्वच मुस्लिमांकडे पाकिस्तानचे हस्तक म्हणून बघितले जाते, असा मुस्लिम समाज व नेत्यांचा आक्षेप आहे. त्यावर फ़ुंकर घालण्याचे प्रयास कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्ष नित्यनेमाने करीत असतात. इतकेच नव्हेतर मुस्लिमांविषयी असला संशय भाजपावालेच पसरवतात, हा सेक्युलर लोकांचा व मोदीविरोधकांचा कायमचा आक्षेप राहिला आहे. पण नेमका तोच बिनबुडाचा आरोप आता त्याच गोटातील हिरो असलेल्या राहुल गांधींनी उत्साहाच्या भरात केलेला आहे. त्यांचा हेतू तसा नाही, हे मान्यच करायला लागेल.

   मुझफ़्फ़रनगरचे मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक आहेत किंवा तिथले तरूण पाकिस्तानला फ़ितूर आहेत; असे राहुलना अजिबात म्हणायचे नव्हते. उलट भाजपाने पेटवलेल्या दंगलीतून दुखावलेले मुस्लिम तरूण पाकिस्तानच्या आहारी जातात व तिथल्या गुप्तहेर खात्याच्या जाळ्यात अडकतात; असेच सुचवून राहुल यांना भाजपाविषयी मुस्लिमात द्वेष निर्माण करायचा होता. पण शब्द किंवा मुद्दे कसे योजावेत, केव्हा फ़िरवावेत आणि कुठे कशावर भर द्यावा; याचे कुठलेही भान नाही की जाण नाही. त्यामुळेच त्यांनी एकामागून एका सभेत तावातावाने आवेशपुर्ण बोलताना स्वपक्षाला अधिकाधिक अडचणीत आणण्याचा सपाटा लावलेला आहे. पण त्यांचा आवेश बघूनच खुश झालेल्यांना त्यातून बुडत्याला काडीचा आधार मिळावा, तसा आनंद झालेला आहे. आता इंदुरच्या भाषणानंतर राहुलना मुस्लिमांवर आळ घ्यायचा नव्हता किंवा त्यांचा मुद्दा वेगळाच होता; असले खुलासे देत बसायची वेळ पक्ष प्रक्त्यांवर आलेली आहे. दुसरीकडे भाजपा सोडून अन्य सेक्युलर पक्षांनाही राहुलवर टिकेचे आसूड ओढण्याची पाळी आली आहे. तिकडे कॉग्रेसच्याच गृहमंत्र्याला मुझफ़्फ़रनगरात पाक हेरसंस्थेचे जाळे असल्यास कुठे व कसे; त्याचे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की आलेली आहे. तेवढेच नाही तर भारत सरकारच्या गुप्तचर विभागाचे नाक कापले गेले आहे. ज्याने राहुलना अशी माहिती दिली, त्या अधिकार्‍याला समोर आणायची मागणी पुढे आली आहे. थोडक्यात एकाच दगडात राहुलनी स्वपक्षाच्या अनेक हितसंबंधांचा फ़टाफ़ट बळी घेऊन चमत्कारच घडवला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल. मोदींनी जे काम आरंभले किंवा हाती घेतले आहे, त्यातही राहुलच मोदींना ‘भारी’ पडले आहेत. मोदींनी कॉग्रेसला देशाभर पराभूत करण्याचे आव्हान स्विकारले आहे, त्याच कॉग्रेसला नामोहरम व नामशेष करण्याच्या कामात मोदींपेक्षा राहुलचे प्रयास अधिक परिणामकारक ठरत असतील, तर मोदींपेक्षा राहुलच ‘भारी’ काम करतात हे नाकारता येईल काय?

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

मतचाचण्यांचा थोडासा इतिहास



  आता देशात मतचाचण्य़ांचे जणू पेवच फ़ुटले आहे. पण विविध संस्थांच्या मदतीने जनमताची चाचणी घेऊन त्यावर कुठला पक्ष जिंकणार किंवा कोणा मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार बनवणार; अशा चर्चा रंगवणार्‍यांना त्यातले शास्त्र कितीसे कळते, याची मला दाट शंका आहे. कारण जेव्हा ह्या तंत्राचा भारतात प्रथमच अवलंब झाला, तेव्हा तमाम वृत्तपत्रे व पत्रकार आणि राजकीय अभ्यासक त्याविषयी कमालीचे साशंक होते. नुसते साशंकच नव्हते तर अशा अंदाजांची खिल्ली उडवण्यातही आघाडीवर होते. कारण जनमानस आपल्यालाच नेमके कळते, असा एक टोकाचा अहंकार भारतीय पत्रकारांमध्ये होता. सहाजिकच त्यांच्या अभ्यास व अनुभवाच्या पलिकडला कोणी त्याविषयी भाष्य करीत असेल; तर या ढुढ्ढाचार्यांना ते रुचणार तरी कसे? पण आज त्यांचेच वंशज किंवा वारस त्याच शास्त्राचा किंवा चाचणी अहवालाचा आधार घेऊन, असे काही छातीठोक राजकीय भाष्य करीत असतात, की त्या तंत्राचा भारतातील आद्यपुरूष मानला जाणारा डॉ. प्रणय रॉय सुद्धा त्यापासून चार हात दूर राहू लागला आहे. अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण जेव्हा अशा मतचाचण्या घेऊन निवडणूकीचे अंदाज वर्तवण्याचा उद्योग इथे भारतात सुरू झाला; तेव्हा आजच्या वाहिन्यांवरील बहुतांश पत्रकारांपासून वृत्तपत्रांचे बहुतांश संपादक नाकाचा शेंबुडही पुसायच्या अकलेचे नव्हते. तर त्यांच्याकडून ते शास्त्र समजून बोलण्याची वा त्याचे नेमके आकलन करण्याची तरी अपेक्षा कशी बाळगता येईल. त्यामुळेच सर्व्हे म्हणजे नमुना मतचाचण्या करून घेतल्या जातात आणि मग महागड्या खेळण्याचा लाडावलेल्या पोराने चुराडा करावा; तसा त्या आकड्यांचा विचका केला जातो. म्हणूनच अशा मतचाचण्यांचा थोडा इतिहास मांडणे मला आवश्यक वाटते. विशेषत: आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकात दिसणारी व आकड्यातही आढळणारी लोकप्रियता, माध्यमातील मुखंडांना उलगडता येत नसल्याने; तो इतिहास समजून घेणे अगत्याचे आहे. गुजरातच्या दहाबारा वर्षापुर्वीच्या दंगलीच्या कलंकातून बाहेर पडून मोदींना देशभर आवश्यक तेवढी बहुमतापर्यंत पोहोचणारी मते मिळतील किंवा नाही; त्याचे उत्तर त्याच इतिहासात दडलेले आहे. म्हणूनच त्या इतिहासाच्या आठवणी थोड्या चाळवणे मला अगत्याचे वाटते.

   मतचाचण्यांचा भारतातील इतिहास वा कालखंड अवघा तेहतीस वर्षांचा आहे. त्याच्याआधी भारतात कधी मतचाचण्य़ा घेतल्या जात नव्हत्या. अर्थात भारतात नाही म्हणून जगातही होत नव्हत्या, असे अजिबात नाही. पुढारलेल्या पाश्चात्य जगात तर निवडणूकच नव्हेतर सातत्याने अशा नेत्यांच्या व राजकीय पक्षाच्या लोकप्रियतेचे अंदाज व्यक्त केले जात होते. पण तसा प्रयोग भारतात करायला कोणी धजावत नव्हता. कारण पाश्चात्य देशाप्रमाणे इथेही लोकशाही व संसदीय लोकशाहीची प्रणाली असली तरी; तिथल्याप्रमाणे इथे द्विपक्षीय लोकशाही लढत नव्हती. देशव्यापी एकमेव कॉग्रेस पक्ष आणि लहानमोठ्या अन्य पक्षांच्या सोबत प्रभावी प्रादेशिक पक्षांचे कडबोळे असल्याने; जनमत कौल शोधणे जिकीरीचे काम होते. त्यामुळेच १९८० पुर्वीच्या काळात निवडणूका असल्या मग गुप्तचर खात्याचा अंदाज बहुतेक वृत्तपत्रात ग्राह्य मानला जायचा. तो क्वचितच खरा ठरायचा. उदाहरणार्थ १९७५ सालात आणिबाणी लादून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटलेल्या इंदिराजींनी अकस्मात आणिबाणी उठवून १९७७ सालात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर केल्या; त्याच मुळात गुप्तचर खात्याच्या खास अंदाजावर. तेव्हा लोकांमध्ये इंदिराजींची लोकप्रियता प्रचंड असल्याने त्या नक्कीच मोठे यश मिळवतील, असा तो अंदाज होता. म्हणून त्यांनी निवडणूकांची अकस्मात घोषणा केली आणि तुरूंगात डांबून ठेवलेल्या विरोधी राजकीय नेत्यांची सुटका करून राजकीय आव्हान स्विकारले. पण दबलेल्या जनमताचा अंदाज गुप्तचर खात्याला आला नव्हता आणि त्याच निवडणुकीत इंदिराजींसह त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा इतिहासातील सर्वात दारूण पराभव झाला. राजस्थान पंजाबपासून बंगालपर्यंतच्या गंगाप्रदेशात म्हणजे संपुर्ण उत्तर भारतात कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरले नाही, इतका तो नामुष्कीचा पराभव होता. चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन घाईगर्दीने स्थापन केलेल्या जनता पक्षाला मतदाराने बहुमत दिले होते. आधी त्या पक्षाने निवडणूका जिंकल्या आणि पुढे त्या पक्षाची औपचारिक स्थापना झाली होती. असे गुप्तचर खात्याचे निवडणूक अंदाज बेभरवशी असायचे. बाकी मग राजकीय अभ्यासक आपापल्या वार्ताहर व पत्रकारांच्या मदतीने हवेतले अंदाज बांधायचे, किंवा भविष्यवेत्ते आपल्या ग्रहमानाचे समिकरण मांडून अंदाज व्यक्त करायचे. त्यापैकी कुठलाच अंदाज खरा ठरण्याची कुठलीही हमी नसायची.

   पण त्या निवडणूकीनंतर तसा पहिला प्रयोग तेव्हा पाक्षिक स्वरूपात प्रसिद्ध होणार्‍या ‘इंडीयाटुडे’च्या संपादकांनी केला होता. प्रणय रॉय नामक एका होतकरू आकडेशास्त्रज्ञाने त्यात पुढाकार घेतला होता. त्याने भारतीय निवडणूकांचेही शास्त्रीय पद्धतीने अंदाज चाचणीतून बांधता येतील, असा दावा करीत ठोकताळे तयार केले. त्याला ‘इंडीयाटुडे’ने सहकार्य केले तरी त्यावर अजिबात विश्वास दाखवला नव्हता. कारण प्रणय रॉयने आपल्या पद्धतीने नमूना मतांची चाचणी घेऊन जे अंदाज तयार केले. त्याला ‘इंडियाटुडे’ने प्रसिद्धी जरूर दिली. पण तिथेच संपादकांनी पुस्तीही जोडली होती. या चाचणी व अंदाजाची संपुर्ण जबाबदारी लेखकाची व चाचणीकर्त्याची आहे आणि त्याविषयी खुद्द संपादकही साशंक असल्याचे स्पष्ट केलेले होते. कारण त्या पहिल्यावहिल्या मतचाचणीने काढलेले अंदाज कुठल्याही पत्रपंडीत, संपादक, राजकीय अभ्यासकाला चक्रावून सोडणारे होते. आज ‘दंगलखोर’ नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे बघून जसे राजकीय अभ्यासक, जाणकार संपादक अविश्वास दाखवतात, तितकाच अविश्वास तेव्हा प्रणय रॉयच्या त्या पहिल्या निवडणूक अंदाजावर नेमका त्याच कारणास्तव दाखवला गेला होता. कारण अडीच वर्षापुर्वी ज्या इंदिरा गांधींना त्यांचा सुपुत्र संजय गांधी याच्यासह आपापल्या मतदारसंघात पराभूत करून मतदाराने नवा इतिहास घडवला होता; तोच मतदार इतक्या अल्पावधीत इंदिराजींचे आणिबाणीतले गुन्हे माफ़ करून त्यांना प्रचंड बहूमताने सत्ता देईल, असा रॉयचा अंदाज होता. म्हणजे त्याची मतचाचणी त्याला तसे सांगत होती. त्यावर अभ्यासक पत्रकारांनी अविश्वास दाखवण्याला आणखी एक कारणही होते. आधीच्या निवडणूकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर इंदिराजींनी त्या पराभूत कॉग्रेस पक्षातही फ़ुट पाडली होती आणि त्यांच्या जोडीला कोणी मान्यवर कॉग्रेस नेते शिल्लक उरलेले नव्हते. पक्षाची संघटना नेत्यांच्या हाती आणि कार्यकर्ते व लोकप्रियता इंदिराजींच्या हाती. इतक्याच बळावर आणिबाणीच्या अत्याचारांनी बदनाम असलेल्या इंदिराजी १९८०च्या मध्यावधी निवडणुकीला सामोर्‍या गेलेल्या होत्या. विस्कळीत दुबळी पक्ष संघटना व कलंकित इतिहास, यामुळे इंदिराजींना पुन्हा मतदार कौल देईल; यावर कुठला राजकीय अभ्यासक विश्वास ठेवणार? दंगलीनंतरही गुजरातच्या मतदाराने तिसर्‍यांदा मोदींना मोठे बहूमत दिले; म्हणून आजच्या राजकीय अभ्यासक पत्रकारांना तो मोदींचा विजय वाटला आहे काय? नेमकी तीच मानसिकता तेव्हाच्या पत्रकार अभ्यासकांनी दाखवलेली होती. मग त्यांना नव्याने निवडणूक अंदाजशास्त्र प्रस्तुत करणारा प्रणय रॉय मुर्ख वाटला, तर नवल कुठले? अगदी त्याचे अंदाज छापणार्‍या ‘इंडियाटुडे’च्या संपादक मंडळानेही त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. मग बाकीच्या वृत्तपत्रे वा पत्रकारांनी त्याची दखल घेण्याचा विषयच कुठे येतो?

   पण या तमाम राजकीय पंडितांना निवडणूक निकाल लागले, तेव्हा तोंडात बोट घालायची पाळी आली. कारण प्रणय रॉयचे अंदाज नुसते बरोबर ठरले नाहीत; तर अगदी तंतोतंत खरे ठरले. ज्या इंदिरा गांधी आणिबाणीने बदनाम झाल्या होत्या आणि तोच ठपका ठेवून त्यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यासह संजय गांधींची पक्षातून हाकालपट्टी केली होती; त्यालाच सोबत घेऊन इंदिराजी लोकांना सामोर्‍या गेल्या होत्या. तरीही त्यांना नुसते बहूमत नव्हेतर दोन तृतियांश बहूमत मिळण्याचा अंदाज रॉयने व्यक्त केला होता. आणि झालेही नेमके तसेच. अडिच वर्षे आधी ज्या जनता पक्षाला लोकांनी भरपूर मते देऊन डोक्यावर घेतले होते; त्याच्यासह इंदिराजींना हाकलणार्‍या कॉग्रेस पक्षाची धुळधाण मतदाराने उडवली होती. इंदिराजींनी ज्याला कोणाला आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून समोर उभे केले; त्याला लोकांनी भरभरून मते दिली होती. त्यांचे निवडणूक चिन्हही बदलले होते. गायवासरू निशाणी बाजूला पडून हाताचा पंजा ही नवी निशाणी घेऊन इंदिराजी जनतेसमोर गेल्या होत्या. त्यासाठी एक आटोपशीर घोषणाही तेव्हा लोकप्रिय ठरली होती. ‘ना जातपर ना पातपर, इंदिराजीकी बातपर, मुहर लगावो हातपर’. आणि लोकांनी खरोखरच हातावर पसंतीची मोहर उठवून इंदिराजींना लोकसभेत अफ़ाट बहुमताने सत्ता बहाल केली. त्यामागचे राजकारण नंतर बघता येईल. मुद्दा आहे, तो देशातल्या पहिल्यावहिल्या मतचाचणीचा अंदाज खरा ठरण्याचा. मात्र त्याची दखल कोणी फ़ारशी घेतली नाही. प्रणय रॉयचे अंदाज नशीबाने खरे ठरले, म्हणून राजकीय पंडीतांनी त्याकडे साफ़ काणाडोळा केला होता. त्याने हे अंदाज कसे काढले किंवा त्यामागचे तंत्र काय आहे, याचाही कोणी उहापोह केला नाही, की कुठे दखलपात्र चर्चाही झाल्या नाहीत. अशी ती पहिली मतचाचणी ‘इंडियाटुडे’च्या त्या अंकातच दफ़न केली गेली. पण ज्यांना इंदिराजी इतके मोठे यश मिळवू शकणार नाहीतच अशी ठाम खात्री होती; तेच राजकीय पंडीत अभ्यासक निकालानंतर त्याची मिमांसा मात्र करीत होते. आपल्या दिवाळखोर राजकीय भाकितावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयास तावातावाने करीत होते. पण लोकमताचा अंदाज काढण्यासाठी हाताशी एक नवे विश्वासार्ह तंत्र आले आहे; त्याची दखल घ्यायची बुद्धी त्यापैकी कोणा शहाण्याला झाली नाही. हीच आपल्या देशातील राजकीय अभ्यासक, जाणकार, पत्रकार वा संपादक विश्लेषकांची दुर्दैवी शोकांतिका आहे. त्यांना आपल्या पुर्वग्रहातून बाहेर पडून सत्य दिसत असले, तरी बघता येत नाही, की समजून घेता येत नाही. वास्तवापेक्षा आपल्या मनातल्या समजुतीला व भ्रमाला घट्ट चिकटून रहाण्याची मनोवृत्ती त्याला कारण आहे. आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यातून नव्या पिढीचे पत्रकार अभ्यासक मुक्त झालेले दिसत नाहीत. कालपरवाच्या मतचाचणीवरील चर्चेत त्याचीच प्रचिती येत होती. म्हणूनच हा इतिहास नव्याने व थोडा सविस्तर सांगणे अगत्याचे झाले आहे. (क्रमश:)